शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड विभागाचा गाडा प्रभारी भरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : उपविभागाचा विस्तार मोठा आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही या तीन तालुक्याच्या कार्यक्षेत्राचा समावेश उमरेड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : उपविभागाचा विस्तार मोठा आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही या तीन तालुक्याच्या कार्यक्षेत्राचा समावेश उमरेड उपविभागात होतो. सध्या याठिकाणच्या दोन्ही बड्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ‘प्रभारी’ म्हणून सांभाळली जात आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी या दोन्ही पदाचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर सुरू आहे. ही दोन्ही कार्यालये आणि अधिकारी उपविभागासाठी महत्त्वपूर्ण असताना ही पदे प्रभारी ठेवण्याचे कारण काय, असा सवाल विचारला जात आहे.

तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींच्या कार्यालयावर नियत्रंण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून एसडीओ यांच्याकडे असते. काेर्टाचे काम, सक्षम प्राधिकारी, न्यायालयीन व दंडाधिकारी कार्य, उत्खननाची परवानगी, जाती प्रमाणपत्र जारी करणे, सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र, एनए लागू करणे व दंड वसूल करणे आदी कार्यप्रणाली अतिशय शिस्तबद्धरीत्या एसडीओ सांभाळतात. उमरेड येथे हिरामण झिरवाळ यांच्याकडे ही जबाबदारी होती. कोरोना काळात त्यांनी मौलिक कार्य पार पाडले. त्यांना मुंबई येथील विधानभवनात बढती मिळाली. १६ डिसेंबरला ते रुजूसुद्धा झाले. झिरवाळ यांच्याऐवजी तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे एसडीओ म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.

उपविभागात कायदा व सुव्यवस्थेचे नियत्रंण व देखरेख राखण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असते. या पदावर पौर्णिमा तावरे कर्तव्यावर होत्या. त्यांचीसुद्धा ५ ऑक्टाेबर २०२० रोजी पुणे शहर पोलीस दलात बदली झाली. सुमारे तीन महिन्यापासून नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची उमरेड येथे बदली झाली असून, ते अद्याप रुजू व्हायचे असल्याचीही बाब समोर येत आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण पदाचा पूर्णवेळ कारभार कुणाकडे, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

....

उमरेडसाठी चढाओढ

उमरेड हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत ‘प्रिय’ ठिकाण आहे. शांत, संयमी नगरीत नागरिकांची कार्यप्रणालीसुद्धा अत्यंत शिस्तप्रिय असते. शिवाय, संत्रानगरी नागपूरपासून उमरेड केवळ ४५ किमी अंतरावर असल्याने विविध सेवाकार्याचा पुरेपूर लाभ याठिकाणी मिळतो. शिवाय कुरघोडीचे राजकारण बघावयास मिळत नसल्याने कार्यालय कोणतेही असो उमरेडच मिळावे, यासाठी चांगलीच चढाओढ आणि लॉबिंग नेहमीच दिसून येते.