शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

दादासाहेब दीक्षाभूमीचे खरे शिल्पकार

By admin | Updated: August 13, 2015 03:44 IST

दिवंगत रा.सू. गवई यांचे कर्तृत्व व प्रयत्नामुळेच आज दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकले.

रा.सू. गवई यांना आदरांजली : नितीन गडकरी यांचे प्रतिपादननागपूर : दिवंगत रा.सू. गवई यांचे कर्तृत्व व प्रयत्नामुळेच आज दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकले. त्यामुळे दिवंगत रा.सू. गवई हेच दीक्षाभूमीचे खरे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आपली आदरांजली व्यक्त करतांना ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले अध्यक्षस्थानी होते तर बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, पीरिपाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई, न्यायमूर्ती भूषण गवई, आ. नाना श्यामकुळे, बसपाचे मुरलीधर मेश्राम, माकपाचे अजय शाहू प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, दादासाहेब गवई यांचे व्यक्तिमत्त्व हे विलक्षण होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. बिहारचे राज्यपाल असतांना त्यांनी तेथील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात मोलाचे कार्य केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सदानंद फुलझेले यांनी दिवंगत दादासाहेब गवई यांच्यामुळेच दीक्षाभूमीवरील जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहू शकल्याचे सांगितले. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, दत्ता मेघे, प्रा. जोगेंद्र कवाडे, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. नितीन राऊत, रमेश बंग, अजय शाहू यांनीही दिवंगत रा.सू. गवई यांच्या आठवणींना उजाळा देत आपली आदरांजली व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या आदरांजलीचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केले. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुरुवातीला सर्वांना बुद्ध वंदना ग्रहण केली. प्रास्ताविक आ. नाना श्यामकुळे यांनी केले. संचालन विलास गजघाटे यांनी केले. (प्रतिनिधी)रिपब्लिकन ऐक्याचे आवाहनदिवंगत रा.सू. गवई यांनी रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे पुन्हा रिपाइंचे ऐक्य व्हावे, असे आवाहन नितीन गडकरी यांच्यासह डॉ. नितीन राऊत, सुलेखा कुंभारे, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. तसेच यावेळी दत्ता मेघे यांनी दीक्षाभूमीवर दिवंगत रा.सू. गवई यांचा पुतळा उभारण्याची विनंती केली. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिवंगत गवई यांचे स्मारक किंवा पुतळा उभारण्यासंबंधी सर्वांनी मिळून निर्णय घ्यावा. यात केंद्र व राज्य सरकार नेहमीच सहकार्य करेल. परंतु त्यात कुठलाही वाद होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी विनंती सुद्धा केली.