शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

यंत्रणेच्या संगनमताने झाडे ताेडणारी टाेळी सक्रिय ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST

नागपूर : काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत असल्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ही भीषणता ग्रामीण भागातही वाढली ...

नागपूर : काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत असल्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ही भीषणता ग्रामीण भागातही वाढली आहे. अशावेळी अंत्यसंस्कारासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागात लाकडांची तस्करी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला असून, झाडे ताेडणारी टाेळी सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात वृक्षताेड राेखणाऱ्या यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे.

पर्यावरण कार्यकर्ता श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रकार निदर्शनास आणला आहे. पूर्वी गावाकडे माेठमाेठी आंब्याची, चिंचेची झाडे दिसायची. शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यावर ही झाडे वर्षानुवर्षे उभी असायची. आजाेबांनी कधीतरी लावलेल्या झाडांची फळे नातवंडं चाखायची; मात्र आता दिसेनाशी झाली आहेत. पैशाच्या माेहापायी ही झाडे विकली गेली, कापली गेली. रस्ते रुंदीकरणाच्या नावानेही शेकडाे झाडे कापली जात आहेत. झाडे कापणाऱ्या टाेळीची मदत घेतली जाते. हे लाेक कुणाचेही ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कधी रात्री तर कधी पहाटेच्या वेळी संधी साधून वृक्षताेड सुरू आहे. शहरात झाडे कापली की, कुणीतरी दखल घेऊन तक्रार दाखल करताे. ग्रामीण भागात मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे दिसते. ही लाकडे माेठ्या प्रमाणात विकली जात आहेत. भंडारा, गाेंदिया, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्यांत हा प्रकार सर्रासपणे हाेत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

बंदी असतानाही कत्तल

दरम्यान, माेठमाेठी जुनी आंब्याची, चिंचेची झाडे ताेडण्यास बंदी आणली आहे. ही झाडे कापता येत नाहीत किंवा आरा मशीनचे मालक विकतही घेऊ शकत नाहीत. यावरही आरा मशीन मालकांनी ताेडगा काढला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मालकीचे झाड ताेडण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखविले जाते. त्यानंतर आंबे लागत नाहीत, माकडांचा हैदाेस हाेत असल्याचे कारण पुढे करून तालुका कृषी अधिकाऱ्याकडून वृक्षताेडीची परवानगी घेतली जाते. कृषी अधिकारीही काही न पाहता परवानगी देताे. या आधारावर मग वनविभागाचीही परवानगी मिळते. मग ४ झाडांची परवानगी घेऊन १० झाडे कापली जात असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

हल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत

देशपांडे यांनी त्यांना आलेला अनुभव कथन केला. शेतीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या देशपांडे यांनी तेथे सुरू असलेली वृक्षताेड थांबविण्याचा प्रयत्न केला. कायद्याचा धाक दाखविला; मात्र त्यातील काहींनी त्यांच्यावरच हल्ला केला हाेता. कुटुंबाचे सदस्य साेबत असल्यानेच बचावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुणीही त्यांच्या वाटेला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.