शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

यंत्रणेच्या संगनमताने झाडे ताेडणारी टाेळी सक्रिय ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST

नागपूर : काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत असल्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ही भीषणता ग्रामीण भागातही वाढली ...

नागपूर : काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत असल्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ही भीषणता ग्रामीण भागातही वाढली आहे. अशावेळी अंत्यसंस्कारासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागात लाकडांची तस्करी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला असून, झाडे ताेडणारी टाेळी सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात वृक्षताेड राेखणाऱ्या यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे.

पर्यावरण कार्यकर्ता श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रकार निदर्शनास आणला आहे. पूर्वी गावाकडे माेठमाेठी आंब्याची, चिंचेची झाडे दिसायची. शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यावर ही झाडे वर्षानुवर्षे उभी असायची. आजाेबांनी कधीतरी लावलेल्या झाडांची फळे नातवंडं चाखायची; मात्र आता दिसेनाशी झाली आहेत. पैशाच्या माेहापायी ही झाडे विकली गेली, कापली गेली. रस्ते रुंदीकरणाच्या नावानेही शेकडाे झाडे कापली जात आहेत. झाडे कापणाऱ्या टाेळीची मदत घेतली जाते. हे लाेक कुणाचेही ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कधी रात्री तर कधी पहाटेच्या वेळी संधी साधून वृक्षताेड सुरू आहे. शहरात झाडे कापली की, कुणीतरी दखल घेऊन तक्रार दाखल करताे. ग्रामीण भागात मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे दिसते. ही लाकडे माेठ्या प्रमाणात विकली जात आहेत. भंडारा, गाेंदिया, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्यांत हा प्रकार सर्रासपणे हाेत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

बंदी असतानाही कत्तल

दरम्यान, माेठमाेठी जुनी आंब्याची, चिंचेची झाडे ताेडण्यास बंदी आणली आहे. ही झाडे कापता येत नाहीत किंवा आरा मशीनचे मालक विकतही घेऊ शकत नाहीत. यावरही आरा मशीन मालकांनी ताेडगा काढला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मालकीचे झाड ताेडण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखविले जाते. त्यानंतर आंबे लागत नाहीत, माकडांचा हैदाेस हाेत असल्याचे कारण पुढे करून तालुका कृषी अधिकाऱ्याकडून वृक्षताेडीची परवानगी घेतली जाते. कृषी अधिकारीही काही न पाहता परवानगी देताे. या आधारावर मग वनविभागाचीही परवानगी मिळते. मग ४ झाडांची परवानगी घेऊन १० झाडे कापली जात असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

हल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत

देशपांडे यांनी त्यांना आलेला अनुभव कथन केला. शेतीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या देशपांडे यांनी तेथे सुरू असलेली वृक्षताेड थांबविण्याचा प्रयत्न केला. कायद्याचा धाक दाखविला; मात्र त्यातील काहींनी त्यांच्यावरच हल्ला केला हाेता. कुटुंबाचे सदस्य साेबत असल्यानेच बचावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुणीही त्यांच्या वाटेला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.