शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारीच करताहेत कांद्याची साठेबाजी

By admin | Updated: August 21, 2015 03:12 IST

व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठेबाजी होत असल्यामुळे घाऊक बाजारात कांदा ५० रुपये तर किरकोळ बाजारात प्रति किलो ७० रुपयांवर पोहोचला आहे.

कृत्रिम दरवाढ : गृहिणी धास्तावल्यानागपूर : व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठेबाजी होत असल्यामुळे घाऊक बाजारात कांदा ५० रुपये तर किरकोळ बाजारात प्रति किलो ७० रुपयांवर पोहोचला आहे. या कृत्रित दरवाढीवर शासनाचे नियंत्रण नसून गृहिणींचे महिन्याचे बजेट कोसळल्याने त्या धास्तावल्या आहेत. सर्वसामान्य महागाईने आधीच त्रस्त आहेत. भाज्याच्या आणि कांद्याच्या किमतीने त्या भर टाकली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्याची गृहिणींची मागणी आहे. साठेबाजी करणारे व्यापारी आणि बाजाराचा कल पाहून कांदे विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी आहे. निर्यात बंदी करावीकळमना आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, कळमना बाजारात येणारा कांदा थेट शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून विक्रीस येतो. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने धाडी टाकून त्यांना कारागृहात टाकण्याची आमची मागणी आहे. बाजारात चांगला कांदा फारच कमी तर निकृष्ट दर्जाचा जास्त प्रमाणात येत आहे. दर्जानुसार त्याची किंमत आहे, असे वसानी म्हणाले.(प्रतिनिधी)मुख्य बाजारपेठांमध्ये किमती वधारल्यानाशिक, अहमदनगर, पुणे येथील मुख्य बाजारपेठांमध्येच कांद्याच्या किमतीत प्रचंड वधारल्या आहेत. दरदिवशी भावांमध्ये चढउतार असते. गुरुवारी चांगल्या प्रतिचा कांदा प्रति किलो ४५ ते ५० रुपये विकला गेला. अशा स्थितीत कळमन्यातील बाजारात कमी दराची अपेक्षा करता येणार नाही. नागपुरातही दर्जानुसार लाल आणि पांढरा कांदा १८०० ते २००० रुपये मण तर किरकोळ बाजारात प्रति किलो ६० ते ७० रुपये विकला गेला. यात साठेबाजी कुठून आली, असा सवालही वसानी यांनी उपस्थित केला. दसरा व दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात आल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.