शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

मेट्रोच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी

By admin | Updated: March 16, 2017 02:18 IST

शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मेयो हॉस्पिटल चौक : नागरिक त्रस्त, रस्त्यावर अंधार नागपूर : शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मेयो चौकातील मेट्रोच्या बांधकामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सकाळी या मार्गावरून कार्यालयात जाणाऱ्यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे मार्ग बदलला आहे. त्यातच सायंकाळी परत येणाऱ्यांना अंधारातच मार्ग काढावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस जास्त संख्येने तैनात करण्याची मागणी या परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. रामझुला-२ आणि मेट्रोचे बांधकाम वेगात सुरू आहे. पण वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे अनेक जण दुसऱ्या मार्गाने कार्यालयात पोहोचत आहेत. रामझुला-२ च्या बांधकामामुळे रामझुला-१ वरून सर्वच गाड्यांची ये-जा सुरू आहे. या पुलावरून चढताना प्रारंभीच अनेक वाहने वळसा घालून परत जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने याच ठिकाणी थांबतात. या परिसरातील नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपायुक्तांकडे निवेदने दिली आहेत. पण पोलीस वाहतूक कोंडीकडे लक्ष न देताना चालान फाडण्यात गर्क दिसतात. ही नेहमीची बाब आहे. मेट्रो रेल्वेचे सुरक्षा रक्षक वाहनांना दिशा देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना न जुमानता चालक वाहने पुढे नेतात. ही बाब वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत आहे. तसेच मेयो चौकातून संत्रा मार्केट मार्गाने रेल्वे स्थानकाला जाताना वाहनचालकाला विशेष प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे सर्व ठिकाणी बॅरिकेडस् लावले आहेत. वाहनचालकाला त्यातून मार्ग काढणे जोखिमेचे ठरत आहे. दूरपर्यंत असलेल्या बॅरिकेडस्ला वळसा घालून प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचावे लागते. ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याशिवाय संत्रा मार्केटकडून गांधीसागरकडे जाणाऱ्या मार्गावर एम्प्रेस मॉलसमोर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काम संथगतीने सुरू असल्यामुळे वाहतूक सुरू होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर रामझुला-१ वरून मुख्य रेल्वेस्थानक चौकात उतरल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली चारचाकी वाहने आणि आॅटोमुळे वाहतुकीची दरदिवशी कोंडी होते. या चौकात वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस चालान फाडण्यात गर्क असल्याचे दिसून येतात. येथील वाहने हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देण्याची या परिसरातील लोकांची मागणी आहे.(प्रतिनिधी)