शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आजचा दिवस निघून जाईल, उद्याचा दिवस चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

- मानसिक तणावामुळे निद्रानाशाच्या समस्या वाढल्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली आरोग्याची धास्ती आणि टाळेबंदीमुळे निर्माण ...

- मानसिक तणावामुळे निद्रानाशाच्या समस्या वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली आरोग्याची धास्ती आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेली पोकळी नैराश्येस कारणीभूत ठरत आहे. नैराश्य हा एक आजार आहे आणि एकटेपणा आला की नैराश्य वाढते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र, कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच निद्रानाश हा वाढलेल्या अनावश्यक तणावामुळे होतो आणि हा तणाव सद्यस्थितीत वाढलेल्या एकलेपणामुळे वाढत आहे.

----------------

तणावाची कारणे

- लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असणे

- घरात राहायची सवय नसल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने नैराश्य वाढणे

- वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडणे

- मित्र/मैत्रिणींशी संवाद तुटल्याने किंवा संवाद साधण्यासाठी कुणीच नसल्याने

- साचेबद्ध आयुष्य झाल्याने तणाव वाढत जातो.

---------

तणावापासून दूर कसे राहता येईल

- सर्वप्रथम जे घडत आहे किंवा होत आहे, त्याचा स्वीकार करणे

- माझा लाभ कशात आहे, याचे चिंतन करणे

- संकटाला देवाने दिलेली संधी समजून वागणे

- असा वेळ कधीच भेटणार नव्हता, तो मिळाला म्हणून जे शक्य नव्हते ते काम करणे. उदा. सिनेमे बघणे, पुस्तके वाचणे, छंदोपासना आदी.

- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता नको तर काळजी घ्या.

----------------

सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

- मला झोप का येत नाही?

- ही अनिश्चितता कधी संपेल?

- दिवस कसा काढावा, समजत नाही?

- घरात राहून कोणती कामे करू?

-------------------

दुसऱ्याला मदत करा आणि इम्युनिटी वाढवा

रोगप्रतिकारक शक्तीचे गणित तुमच्या समाधानाशी निगडित आहे. एका अर्थी संकटात दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद सर्वाधिक असतो. त्यामुळे मदतीसाठी सज्ज राहा, तुमची इम्युनिटी नक्की वाढेल. सोबतच रडगाणे न गाताच वास्तवाचा सामना करा आणि मला हे बदलवता येते, हे स्वत:लाच सांगा. योग शिकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आशेवर जगणे हे उत्तम टॉनिक आहे.

- डॉ. अविनाश जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

---------------

हल्लीच्या समस्या क्लिनिकल डिप्रेशन नव्हेत

हल्ली मानसिक स्वास्थ्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली नक्कीच आहे. मात्र, खूप गंभीर असे विषय नाहीत. सर्वाधिक रुग्ण केवळ आणि केवळ झोपेच्या तक्रारी घेऊन येत आहेत. या तक्रारी क्लिनिकल डिप्रेशनच्या नाहीत. सवय नसलेल्या गोष्टी अचानक जीवनात आल्या की या समस्या येतात. लॉकडाऊन ही अनपेक्षित घडलेली क्रिया आहे आणि त्यामुळे अशा क्षुल्लक तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.

.................