शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. ती आज सकाळी उघडकीस आली.

शुभम आनंद तिलघरे (वय ३०, रा. वाघधरा) असे मृताचे नाव आहे. त्याला दारू आणि गांजाचे भारी व्यसन होते. तो त्याच्या मित्रांना नेहमीच दारू पाजण्यासाठी त्रास देत होता. प्रसंगी हिंसक होऊन मारहाण करत धमकीही द्यायचा. त्याच्या या त्रासाला त्याचे सर्वच मित्र कंटाळले होते. दिवसभर कबाटकष्ट करून रोजी मिळवायची आणि शुभमवर कशाला उडवायची, असे त्यांना वाटत होते. त्याचा नेहमीसाठी बंदोबस्त करायला पाहिजे, असेही त्यांना वाटायचे. मात्र, मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, अशी त्यांची अवस्था होती. त्यामुळे आरोपी नीलेश उर्फ गजनी शहा, अरून जसवंत सिंग आणि बबलू रामाधर सलोडिया या तिघांनी शुभम तिलघरेला संपवण्याचा कट रचला. नेहमीप्रमाणे शूभम बुधवारी रात्री आरोपींच्या मागे दारूसाठी लागला. आरोपींनी त्याला राजीवनगरमधील दारूच्या भट्टीत दारू पाजली. नंतर त्याला एका पडक्या शाळेच्या आवारात नेले. तेथे दाट झाडंझुडपं वाढली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी तिकडे कुणी फिरकत नाही. आरोपींनी शूभमला तिकडे नेले आणि त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला ठार मारले. गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास त्याचा मृतदेह पडून दिसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. माहिती कळताच एमआयडीसीचेे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली. शूभमला रात्री आरोपी नीलेश, अरूण आणि बबलू या तिघांनी सोबत नेले होते, ही माहिती कळताच पोलिसांनी त्यांना शोधले आणि गुरुवारी सायंकाळी अटक केली.

---

भाजी कापायचे चाकू विकत घेतले

आरोपींनी शूभमची हत्या करण्यासाठी तीन चाकू २० - २० रुपयांत विकत घेतले. हत्या करताना आरोपींच्या एका चाकूचे पाते वाकले. प्रारंभी त्याला धाक दाखवून त्याचा नेहमीचा त्रास संपवण्याचा आरोपींचा उद्देश होता. नंतर मात्र त्याला जिवंत सोडले तर तो नशेसाठी आपलाच कुणाचा जीव घेईल, असे आरोपींना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याची हत्या केली.

---