शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात साडेतीनशे कुटुंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 07:00 IST

Nagpur news नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे.

ठळक मुद्देमॉडेल मील चाळीचा पुनर्विकास होईनामनपा प्रशासन उदासीन, घरकुल योजनाही थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे. ही जीर्ण इमारत केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. पर्यायी घरकुल न मिळाल्याने या चाळधारकांना नाईलाजाने येथे राहावे लागत आहे. तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात ही कुटुंब जीवन जगत आहेत.

तीस वर्षांपूर्वी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली होती. मॉडेल मिलचे हस्तांतरण २ जुलै १९९९ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी चाळीतील रहिवाशांना तीन महिन्यात पर्यायी घरे उपलब्ध करण्याचे आश्वासन तत्कालिन पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु, २० वर्षे झाली तरीही चाळधारकांना हक्काचे घर मिळालेले नाही.

मॉडेल मिल चाळ सुधार संघर्ष समितीने वेळोवेळी तत्कालिन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली. परंतु, येथील कामगारांना घरे मिळालेली नाहीत. मॉडेल मिल बंद होऊन १५ वर्षे झाली तर ३० वर्षांपासून चाळधारक हक्काच्या घरांची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनेही केली, मात्र न्याय मिळालेला नाही.

 करारानंतरही घरे मिळाली नाहीत

मॉडेल मिल चाळीची जागा राज्य शासनाने एन. टी. सी.ला लीजवर दिली होती. हा करार ७ डिसेंबर २०११पर्यंत होता. या जमिनीवर कामगारांना घरे बांधून देण्यासाठी ३.१६ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. चाळीची जागा पी. पी. असोसिएट्स या बिल्डरला विकली आहे. यावेळी एन. टी. सी.आणि पी. पी. असोसिएट्स यांच्यात झालेल्या करारानुसार येथील कामगारांना विनामूल्य ३०० चौरस फुटाची घरे बांधून देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, घरे बांधून मिळालेली नाहीत.

दिलेली लिज रद्द करा

चाळीच्या जमिनीची लिज २०११मध्ये संपली. मात्र, नझुल अधिकाऱ्यांनी कामगारांना विश्वासात न घेता, ही जमीन पी. पी. असोसिएट्सला ३० वर्षांच्या लिजवर दिली. मात्र, केलेल्या करारानुसार कामगारांना घरे बांधून न दिल्यामुळे ही लिज रद्द करावी, अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव डोंगरे यांनी केली आहे.

३ महिन्याचे आश्वासन ३० वर्षानंतही अपूर्ण

मॉडेल मिळ चाळधारकांना ३ महिन्यात घरे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ३० वर्षे झाली तरी घरे मिळालेली नाहीत. २००४ मध्ये न्यायालयाने कामगारांना घरे देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून चाळधारकांचा संघर्ष चालू आहे. परंतु अजूनही त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे.

टॅग्स :Socialसामाजिक