शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

अकरावी प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’

By admin | Updated: June 19, 2014 01:03 IST

शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते अकरावी प्रवेशाकडे. मंगळवारपासूनच अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व

जोरदार चुरस : विज्ञान, द्विलक्षीला प्राधान्यनागपूर : शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते अकरावी प्रवेशाकडे. मंगळवारपासूनच अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालांत ८.९४ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय प्राविण्यश्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण उत्तीर्ण झालेल्यांच्या १७ टक्के असल्याने नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस पहायला मिळणार आहे.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या यंदाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत विज्ञान व द्विलक्षीसोबतच कला व वाणिज्य शाखांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे प्राधान्य हे विज्ञान किंवा द्विलक्षी शाखेलाच असले. त्यातही द्विलक्षीला विशेष पसंती असते. यंदा चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढलेले प्रमाण व सोबतच ‘सीबीएसई’तील विद्यार्थ्यांकडून करण्यात येणारे अर्ज यामुळे प्रवेशाची टक्कर वाढली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढीस‘सीबीएसई’तील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मागील वर्षी विभागातून ४,५६२ विद्यार्थी सहभागी झाले होते तर यंदा हाच आकडा ६, ३०० इतका होता. राज्य मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. मागील वर्षीपेक्षा निकाल वाढल्याने खऱ्या अर्थाने चुरस वाढीस लागली आहे.शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ.आंबेडकर विज्ञान महाविद्यालय यांच्यात प्रवेशासाठी एक एक गुणदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. शहरात द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या जवळपास ३,७६० तर विज्ञानच्या १७,१२० जागा आहेत.(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची अर्ज घेण्यासाठी गर्दीदरम्यान, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज विकत घेण्यासाठी शहरांतील निरनिराळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे ‘सीबीएसई’ व शहराबाहेरील शाळांसाठी विद्यार्थ्यांनी धनवटे नॅशनल कॉलेज, डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय व श्री.एम.एम.मोहता विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे धाव घेतली. सकाळच्या वेळेस तर विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.