शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध व बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजवा

By admin | Updated: May 28, 2017 02:11 IST

तथागत बुद्ध यांचा जागतिक शांतीचा संदेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजवून आपण पुढे वाटचाल करायला हवी,

शरद पवार : शांतिवनातील बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तथागत बुद्ध यांचा जागतिक शांतीचा संदेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीमध्ये रुजवून आपण पुढे वाटचाल करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी शांतिवन येथे केले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील प्रत्येक क्षणांचे साक्षी, त्यांनी वापरलेले साहित्य चिंचोली शांतिवन येथील संग्रहालयात आहेत. शरद पवार येथे दर्शन घेण्याकरिता आले होते. यावेळी त्यांनी संग्रहालयात ठेवण्यात आलेले आंबेडकर यांचे साहित्य, संविधान लिहिलेले टाईपराइटर, पेन, वृत्तपत्रे व कपडे आदींची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी चिंचोली बुद्धविहार येथील तथागत बुद्ध व आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तथागत बुद्धाचे जागतिक शांततेचे विचार आंबेडकरांनी कृतीमधून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविले पाहिजे. शांतिवन याचे प्रेरणादायी कें द्र ठरेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, चिंचोली गाव हे बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणारे आहे. दिवंगत वामनराव गोडबोेले यांनी या गावाची निवड केली. त्यांनी नागपूरकरांच्या भावनांचा आदर केला. आंबेडकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार झालेले शांतिवन हे जगाच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही. शांतिवन विकासाचा ६५० कोटींचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी द्यावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूचे जतन करावे, अशी मागणी गजभिये यांनी केली. त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. याप्रसंगी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल देशमुख, माजी मंत्री व ग्रामीण अध्यक्ष रमेश बंग, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, राजाभाऊ टांकसाळे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रदेश संघटन सचिव विजय गजभिये, जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, शहराध्यक्ष दिनकर वानखेडे, महिला शहर अध्यक्ष अलका कांबळे, दिलीप पनकुले, चिंचोली संग्रहालयाचे संचालक संजय पाटील, उपसरपंच ईश्वर उबळे, शेखर गोडबोले, प्रकाश सहारे, प्रदीप लांबसोंगे, जयंता टेंभुर्णे, विलास सोनवणे, एनआयटीचे अधीक्षक अभियंता आर.के. पिंपळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.