शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

उपासमार थांबविण्यासाठी ते बनले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

दिनकर ठवळे काेराडी : काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र ‘देऊळ बंद’ आहेत. काेराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेचे ...

दिनकर ठवळे

काेराडी : काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र ‘देऊळ बंद’ आहेत. काेराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिरही या काळात बंद आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या भिकाऱ्यांची उपासमार हाेत हाेती. ही बाब लक्षात घेत भिकाऱ्यांची उपासमार थांबविण्यासाठी काेराडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. मंदिर परिसरातील भिकाऱ्यांना दरराेज पाैष्टिक जेवण दिले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून काैतुक हाेत आहे.

काेराडी मंदिरात भाविकांकडून भिकाऱ्यांना अन्नदान केले जाते. यावर त्यांची उपजीविका चालत हाेती. परंतु मंदिर बंद असल्याने पैसे व अन्नरूपाने मिळणारी भिक्षा बंद झाली. यामुळे भिकाऱ्यांची उपासमार व्हायला लागली. ही बाब पाहता ग्रामपंचायतीने भिकाऱ्यांना भाेजन देण्याचे ठरविले. ३० ते ४० भिकाऱ्यांसाठी दरराेज जेवण करणे, त्यांच्यापर्यंत पाेहचविणे, वाढणे या प्रक्रियेसाठी मनुष्यबळ वा निधीची गरज हाेती. अन्नधान्य व किराणा उपलब्ध करून दिला जाईल, परंतु पुढील जबाबदारी कुणीतरी सामाजिक तत्त्वावर घ्यावी, अशी ग्रामपंचायतची अपेक्षा हाेती. अशास्थितीत ग्रामपंचायतीचे कंत्राटी कामगार दिलीप बांगरे यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास संमती दर्शविली. मागील वर्षीच्या कडक लाॅकडाऊननंतर काहीशी विश्रांती व एप्रिल महिन्यापासून पुन्हा सुरू झालेल्या निर्बंधाच्या काळात दिलीप बांगरे हे आपल्या कुटुंबीयांसह भिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत.

ग्रामपंचायतकडून बांगरे यांना किराणा व भाजीपाला उपलब्ध करून दिला जातो. दिलीप बांगरे यांच्यासह पत्नी भागीरथा बांगरे, मुलगी वैष्णवी हे तिघेही दरराेज स्वत: स्वयंपाक करतात. त्यानंतर मंदिर परिसरात सर्व भिकाऱ्यांना जेवण दिले जाते. या कार्यात त्यांना रमेश मिरासे, अविनाश जनबंधू, गणेश मेश्राम, आकाश बाेरकर यांचीसुद्धा मदत मिळते. दिलीप बांगरे व रमेश मिरासे हे ग्रामपंचायतीचे कंत्राटी कामगार असून, त्यांच्याकडे पाणीपुरवठा व्यवस्थेचे काम आहे. नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून मंदिर परिसरातील भिकाऱ्यांना जेवण मिळावे, यासाठी ही मंडळी कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न जाता सेवाभाव करीत आहेत.

भिकाऱ्यांसाठी भाेजनाची व्यवस्था पाहून खापरखेडा, छत्रपूर येथील भिकारी या ठिकाणी जेवणासाठी येतात. कचरा, प्लास्टिक व लाेखंड गाेळा करणारे अनेक निराधार व्यक्ती येथे भाेजनासाठी येतात. या सर्वांना नियमित जेवण दिले जाते. यासाठी अन्नधान्याचा पुरवठा ग्रामपंचायत करीत असली तरी या सेवाकार्यात सामाजिक कार्यकर्ते भास्कर चिंचूरकर, जयेंद्र बरडे, किशाेर बरडे, मनाेज सावजी, नगरसेवक महेश धुळस, सरपंच नरेंद्र धानाेले आदींचे आर्थिक याेगदान आहे.