शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

वाढीव शेतजमिनीचा मोबदलाच मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : उमरेड ते कुही (माहुर्ली) पॅकेज-३ अंतर्गत नागपूर-नागभीड ब्राॅडगेज रेल्वेचे काम सुरू आहे. या अनुषंगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : उमरेड ते कुही (माहुर्ली) पॅकेज-३ अंतर्गत नागपूर-नागभीड ब्राॅडगेज रेल्वेचे काम सुरू आहे. या अनुषंगाने काही शेतकऱ्यांच्या वाढीव शेतजमिनीवर संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केले. मातीकाम, मुरुमकाम सुरू आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात गेल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळाला. वाढीव शेतजमिनीचा गुंता कायम आहे. आम्हाला नोटीसही दिल्या गेल्या नाहीत. काम सुरू केले आणि मोबदलाही मिळाला नाही, असा आरोप उमरेड तालुक्यातील बाह्मणी (कुंभापूर) येथील शेतकऱ्यांचा आहे.

सध्या बाह्मणी (कुंभापूर) परिसरात रेल्वेचे मातीकाम सुरू आहे. यामध्ये वासुदेव चिलमकर, श्रावण वाढई, नाना लुटे, संजय लुटे यांची वाढीव शेतजमीन गेली असून, आम्हास तातडीने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासन, तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीकडे पत्रव्यवहारही केला आहे. बाह्मणी (कुंभापूर) या परिसरातून नागपूर-नागभीड रेल्वे धावणार आहे. पूर्वी या संपूर्ण प्रवासात बाह्मणी रेल्वे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण होते. याच कारणाने भविष्यात या ठिकाणी रेल्वे स्टेशनची निर्मितीही होईल.

नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वेचे चार वेगवेगळ्या टप्प्यात काम सुरू आहे. यामध्ये नागभीड ते भिवापूर, भिवापूर ते उमरेड, उमरेड ते कुही (माहुर्ली) आणि कुही ते नागपूर असे चार पॅकेज आहेत. साधारणत: ३० किलोमीटरच्या अंतरावर टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून, चार कंपन्यांकडे याबाबतचे कंत्राट सोपविण्यात आले आहे. उमरेड ते कुही (माहुर्ली) या पॅकेजमध्ये पी.व्यंकटा रमण्णा इंजिनीअरिंग ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट मिळाले आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी, तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, वाढीव शेतजमिनीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मोजणी झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल, असे उत्तर दिले. प्रक्रियेपूर्वीच आमची शेतजमीन का घेतली, असा सवाल संजय लुटे यांनी उपस्थित केला आहे. तातडीने समस्या सोडवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

....

शेतात माती, शेतकऱ्यांवर भुर्दंड

बाह्मणी (कुंभापूर) परिसरात रेल्वेचे काम सुरू असताना, रेल्वे रूळ आणि अवतीभवती असलेली माती काही शेतकऱ्यांच्या शेतात संबंधित कंत्राटदाराने टाकली. खोदकाम केलेली ही माती शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यानंतर, समतल करण्याचे काम करून देण्याचा शब्द कंत्राटदाराने दिला होता. त्यानंतरही शेतातील मातीची लेव्हलिंग (समतल) केली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सदर काम पूर्ण केले. शेतकऱ्यांवर विनाकारण भुर्दंड बसला असून, हा खर्च संबंधित कंपनीने द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने उर्वरित नाली काम करून द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.