शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव शेतजमिनीचा मोबदलाच मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : उमरेड ते कुही (माहुर्ली) पॅकेज-३ अंतर्गत नागपूर-नागभीड ब्राॅडगेज रेल्वेचे काम सुरू आहे. या अनुषंगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : उमरेड ते कुही (माहुर्ली) पॅकेज-३ अंतर्गत नागपूर-नागभीड ब्राॅडगेज रेल्वेचे काम सुरू आहे. या अनुषंगाने काही शेतकऱ्यांच्या वाढीव शेतजमिनीवर संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केले. मातीकाम, मुरुमकाम सुरू आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात गेल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळाला. वाढीव शेतजमिनीचा गुंता कायम आहे. आम्हाला नोटीसही दिल्या गेल्या नाहीत. काम सुरू केले आणि मोबदलाही मिळाला नाही, असा आरोप उमरेड तालुक्यातील बाह्मणी (कुंभापूर) येथील शेतकऱ्यांचा आहे.

सध्या बाह्मणी (कुंभापूर) परिसरात रेल्वेचे मातीकाम सुरू आहे. यामध्ये वासुदेव चिलमकर, श्रावण वाढई, नाना लुटे, संजय लुटे यांची वाढीव शेतजमीन गेली असून, आम्हास तातडीने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासन, तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीकडे पत्रव्यवहारही केला आहे. बाह्मणी (कुंभापूर) या परिसरातून नागपूर-नागभीड रेल्वे धावणार आहे. पूर्वी या संपूर्ण प्रवासात बाह्मणी रेल्वे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण होते. याच कारणाने भविष्यात या ठिकाणी रेल्वे स्टेशनची निर्मितीही होईल.

नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वेचे चार वेगवेगळ्या टप्प्यात काम सुरू आहे. यामध्ये नागभीड ते भिवापूर, भिवापूर ते उमरेड, उमरेड ते कुही (माहुर्ली) आणि कुही ते नागपूर असे चार पॅकेज आहेत. साधारणत: ३० किलोमीटरच्या अंतरावर टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून, चार कंपन्यांकडे याबाबतचे कंत्राट सोपविण्यात आले आहे. उमरेड ते कुही (माहुर्ली) या पॅकेजमध्ये पी.व्यंकटा रमण्णा इंजिनीअरिंग ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट मिळाले आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी, तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, वाढीव शेतजमिनीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मोजणी झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल, असे उत्तर दिले. प्रक्रियेपूर्वीच आमची शेतजमीन का घेतली, असा सवाल संजय लुटे यांनी उपस्थित केला आहे. तातडीने समस्या सोडवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

....

शेतात माती, शेतकऱ्यांवर भुर्दंड

बाह्मणी (कुंभापूर) परिसरात रेल्वेचे काम सुरू असताना, रेल्वे रूळ आणि अवतीभवती असलेली माती काही शेतकऱ्यांच्या शेतात संबंधित कंत्राटदाराने टाकली. खोदकाम केलेली ही माती शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यानंतर, समतल करण्याचे काम करून देण्याचा शब्द कंत्राटदाराने दिला होता. त्यानंतरही शेतातील मातीची लेव्हलिंग (समतल) केली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सदर काम पूर्ण केले. शेतकऱ्यांवर विनाकारण भुर्दंड बसला असून, हा खर्च संबंधित कंपनीने द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने उर्वरित नाली काम करून द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.