शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: March 15, 2015 02:28 IST

विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत.

नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून विदर्भाचा विकास आता अशक्य असून आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे शनिवारी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सीताबर्डी स्थित हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात आयोजित ‘केळकर समितीचा अहवाल आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केळकर समितीच्या अहवालाचे संक्षिप्तपणे विश्लेषण करतांना सांगितले, केळकर समिती नेमल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, आता आपण अनुशेषाची भाषा बदलून विकासाची भाषा बोलली पाहिजे. केळकर समितीने तेच सूत्र स्वीकारून विकासातील तूट, सरासरी पासून अंतर, तफावत इत्यादी शब्द वापरून विकासाची रचना मांडली आहे. मुंबई-ठाणे, पुणे-नाशिक येथेच औद्योगिक केंद्रीकरण झाले. ते कमी करण्याचे उपाय समितीने सुचविले नाही. वैदर्भीय जनतेमध्ये शासकीय धोरणांविषयी प्रचंड संताप आहे. शासनाने विश्वासघात केल्याची लोकांमध्ये भावना आहे.सोबतच समितीने तडजोड करण्याची प्रवृतीत, महाराष्ट्राप्रति बांधिलकी, महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी पुन्हा समर्पित होण्याची वृत्ती, महाराष्ट्राच्या पुनर्विचाराची आवश्यकता, अशा आशयाच्या शिफारशींचे समर्थन केले आहे. त्यामुळे केळकर समिती केवळ एक सापळा आहे. असे स्पष्ट करीत विदर्भातील जनतेने या सापळ्यापासून सावध होऊन केळकर समितीचा अहवाल नाकारावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची ठामपणे मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. राम नेवले यांनी प्रास्ताविक केले. दिलीप नरवडिया यांनी संचालन केले. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, सरोज काशीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)