शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: March 15, 2015 02:28 IST

विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत.

नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून विदर्भाचा विकास आता अशक्य असून आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे शनिवारी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सीताबर्डी स्थित हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात आयोजित ‘केळकर समितीचा अहवाल आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केळकर समितीच्या अहवालाचे संक्षिप्तपणे विश्लेषण करतांना सांगितले, केळकर समिती नेमल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, आता आपण अनुशेषाची भाषा बदलून विकासाची भाषा बोलली पाहिजे. केळकर समितीने तेच सूत्र स्वीकारून विकासातील तूट, सरासरी पासून अंतर, तफावत इत्यादी शब्द वापरून विकासाची रचना मांडली आहे. मुंबई-ठाणे, पुणे-नाशिक येथेच औद्योगिक केंद्रीकरण झाले. ते कमी करण्याचे उपाय समितीने सुचविले नाही. वैदर्भीय जनतेमध्ये शासकीय धोरणांविषयी प्रचंड संताप आहे. शासनाने विश्वासघात केल्याची लोकांमध्ये भावना आहे.सोबतच समितीने तडजोड करण्याची प्रवृतीत, महाराष्ट्राप्रति बांधिलकी, महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी पुन्हा समर्पित होण्याची वृत्ती, महाराष्ट्राच्या पुनर्विचाराची आवश्यकता, अशा आशयाच्या शिफारशींचे समर्थन केले आहे. त्यामुळे केळकर समिती केवळ एक सापळा आहे. असे स्पष्ट करीत विदर्भातील जनतेने या सापळ्यापासून सावध होऊन केळकर समितीचा अहवाल नाकारावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची ठामपणे मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. राम नेवले यांनी प्रास्ताविक केले. दिलीप नरवडिया यांनी संचालन केले. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, सरोज काशीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)