शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

धरणे मंडपासाठी पैसे नाही; बाहेरच मांडला ठिय्या!

By admin | Updated: December 12, 2014 00:31 IST

हाताला काम नाही, खिशात पैसे नाही, ओळखीचे माणसं म्हणावे तर इथे कुणीच नाही... आमच्याही मागण्या आहेत, त्या पदरी पाडून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी कसेतरी

वनश्रमिकांचे धरणे आंदोलन : कामच नाही तर पैसे आणणार कुठून?गणेश खवसे - नागपूरहाताला काम नाही, खिशात पैसे नाही, ओळखीचे माणसं म्हणावे तर इथे कुणीच नाही... आमच्याही मागण्या आहेत, त्या पदरी पाडून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी कसेतरी नागपूर गाठले. मात्र धरणे आंदोलनासाठी उभारलेले मंडप घेण्याकरिता अडीच हजार रुपये आणणार तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित करीत ‘आम्हाला कायम सेवेत घ्या’, अशी आर्त मागणी वनश्रमिकांनी केली आहे. वन विभागात रोजंदारी वनमजूर असलेल्यांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी वनश्रमिक संघाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. पटवर्धन मैदानात हे आंदोलन करण्यात येत आहे. सध्या अनेक संघटनांच्या वतीने तिथे धरणे आंदोलन सुरू आहे. यासाठी त्यांना छोटे मंडप देण्यात येते. मात्र त्यासाठी एका दिवसाकरिता अडीच हजार रुपये आकारण्यात येते. अनेक संघटनांचे पदाधिकारी असे आहेत की त्यांना नोकरी नाही; उपजीविकेचे साधन नाही. नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. त्या सर्व संघटनांनी भाड्याने मंडप घेतलेले आहेत. मात्र याला अपवाद आहे नाशिक जिल्हा वनश्रमिक संघ. या संघात केवळ नाशिकच नव्हे तर ठाणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातीलही वनमजूर असून, त्यांनी उघड्यावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. पारा १३ अंशावर आला आहे. अशास्थितीत उघड्यावर कुडकुडत रात्र काढण्याची वेळ वनमजुरांवर आली आहे. या प्रत्येकांनी खूप तर एक शाल आणली आहे. तेवढ्यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे. या रोजंदारी वनमजुरांपैकी बरेचसे वनमजूर बुधवारी रात्रीच पटवर्धन मैदानात डेरेदाखल झाले तर काही आज, गुरुवारी दुपारपर्यंत आले. आणखी काही वनमजूर येणार आहेत. मात्र मंडप घेण्यासाठी पैसे नसल्याने बाहेरच धरणे आंदोलन करण्याचा निर्धार या सर्वांनी केला आहे. या धरणे आंदोलनात राजेंद्र साळुंके, मुजम्मिल शेख, भास्कर दाणे, चंदर बरडे, नारायण सहारे, दिलीप सुनअहिरे, लहुशंकर बोरसे, कृष्णा माडी, संभाजी मदने, बाबा चव्हाण, सर्जेराव वगरे, प्रकाश काळंभे, संभाजी जाधव, गणपती कांबळे, तानाजी चव्हाण, प्रवीण तोडकर, सदाशिव शिंदे, पोपट मेधने आदी सहभागी झाले आहेत.वनमजुरांच्या या आहेत मागण्यावन विभागातील ५०८९ रोजंदारी वनमजुरांना कायम करण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. त्यासाठी वनमजुरांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीतून केवळ ३०१४ वनमजुरांना कायम करण्यात आले. मात्र उर्वरित वनमजूर सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी वनमजूर धरणे आंदोलन करीत आहे. वर्षाचे २४० दिवस याप्रमाणे पाच वर्ष सेवेत असलेल्यांना कायम करण्यात येईल, असा शासन निर्णय आहे. मात्र पात्र वन मजुरांना डावलण्यात आले. ज्यांना सेवेत घेतले नाही अशांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु, त्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन देत न्यायालयातून ‘केस’ मागे घेण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी ‘केस’ मागे घेतली. यानंतरही त्यांना सेवेत घेतलेले नाही. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करीत असताना ८ डिसेंबर २०१३ रोजी देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यापैकी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर इतर मंत्री आहेत. किमान मुख्यमंत्र्यांनी तरी या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी आर्त विनवणी वनमजुरांनी केली आहे.