शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

लाखोंची उधळपट्टी, जिवंत झाडांचा पत्ता नाही

By admin | Updated: August 15, 2015 03:04 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

मनपाच्या वृक्षलागवडीची चौकशी करा : जनमंचची मागणीनागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याबाबतचा पुरेसा अहवालच मनपाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे मनपाच्या वृक्षारोपण कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या वृक्षारोपनाच्या चौकशीची मागणी जनमंचने केली आहे.सामाजिक संघटना जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांच्यातर्फे माहितीच्या अधिकारात मनपाच्या उद्यान विभागाकडे जून २०१२ ते जून २०१५ या कालावधीत वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात आलेली झाडे, यापैकी जिवंत असलेली झाडे आणि या उपक्रमावर झालेला खर्च याबाबत माहिती मागविण्यात आली. याअंतर्गत मनपाकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्यान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे २०१२ ते २०१३ या कालावधीत विभागाद्वारे १ लाख २७ हजार रोपटे लावण्यात आली. २०१३-२०१४ या काळात २३ हजार ५२७ वृक्ष लावण्यात आली, तर २०१४ ते २०१५ या कालावधीत केवळ १८ हजार २२१ झाडे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापैकी जिवंत उरलेल्या झाडांबाबत प्राप्त माहितीनुसार २०१२-२०१३ या काळातील केवळ ४८ हजार ७११ झाडे जगू शकल्याचे समजते. २०१३-२०१४ या कालावधीतील केवळ १६०० झाडे जिवंत आहेत, तर २०१४-२०१५ या काळातील केवळ ७८८२ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्षारोपण हे लोकसहभागातून झाल्यामुळे उर्वरित झाडांची माहिती मिळणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लागलेल्या खर्चाबाबत मनपाने संभ्रम निर्माण करणारे उत्तर दिले आहे. उद्यान विभागतर्फे २०१४ ते २०१५ या कालावधीत वृक्षारोपणावर २६ लाख ३६ हजार ९२२ खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आल्याचे कारण देत २०१२-२०१३ आणि २०१३-३०१४ चा खर्च सादरच करण्यात आला नाही. वृक्षलागवडीनंतर झाडे जगविणे शक्य नसल्यास लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. हिरवळीच्या नावाखाली हिरव्या व लाल नोटा खिशात भरण्यासाठीच हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिकेने तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी प्रमोद पांडे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)