शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची उधळपट्टी, जिवंत झाडांचा पत्ता नाही

By admin | Updated: August 15, 2015 03:04 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

मनपाच्या वृक्षलागवडीची चौकशी करा : जनमंचची मागणीनागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याबाबतचा पुरेसा अहवालच मनपाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे मनपाच्या वृक्षारोपण कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या वृक्षारोपनाच्या चौकशीची मागणी जनमंचने केली आहे.सामाजिक संघटना जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांच्यातर्फे माहितीच्या अधिकारात मनपाच्या उद्यान विभागाकडे जून २०१२ ते जून २०१५ या कालावधीत वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात आलेली झाडे, यापैकी जिवंत असलेली झाडे आणि या उपक्रमावर झालेला खर्च याबाबत माहिती मागविण्यात आली. याअंतर्गत मनपाकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्यान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे २०१२ ते २०१३ या कालावधीत विभागाद्वारे १ लाख २७ हजार रोपटे लावण्यात आली. २०१३-२०१४ या काळात २३ हजार ५२७ वृक्ष लावण्यात आली, तर २०१४ ते २०१५ या कालावधीत केवळ १८ हजार २२१ झाडे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापैकी जिवंत उरलेल्या झाडांबाबत प्राप्त माहितीनुसार २०१२-२०१३ या काळातील केवळ ४८ हजार ७११ झाडे जगू शकल्याचे समजते. २०१३-२०१४ या कालावधीतील केवळ १६०० झाडे जिवंत आहेत, तर २०१४-२०१५ या काळातील केवळ ७८८२ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्षारोपण हे लोकसहभागातून झाल्यामुळे उर्वरित झाडांची माहिती मिळणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लागलेल्या खर्चाबाबत मनपाने संभ्रम निर्माण करणारे उत्तर दिले आहे. उद्यान विभागतर्फे २०१४ ते २०१५ या कालावधीत वृक्षारोपणावर २६ लाख ३६ हजार ९२२ खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आल्याचे कारण देत २०१२-२०१३ आणि २०१३-३०१४ चा खर्च सादरच करण्यात आला नाही. वृक्षलागवडीनंतर झाडे जगविणे शक्य नसल्यास लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. हिरवळीच्या नावाखाली हिरव्या व लाल नोटा खिशात भरण्यासाठीच हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिकेने तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी प्रमोद पांडे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)