शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

लाखोंची उधळपट्टी, जिवंत झाडांचा पत्ता नाही

By admin | Updated: August 15, 2015 03:04 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

मनपाच्या वृक्षलागवडीची चौकशी करा : जनमंचची मागणीनागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याबाबतचा पुरेसा अहवालच मनपाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे मनपाच्या वृक्षारोपण कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या वृक्षारोपनाच्या चौकशीची मागणी जनमंचने केली आहे.सामाजिक संघटना जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांच्यातर्फे माहितीच्या अधिकारात मनपाच्या उद्यान विभागाकडे जून २०१२ ते जून २०१५ या कालावधीत वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात आलेली झाडे, यापैकी जिवंत असलेली झाडे आणि या उपक्रमावर झालेला खर्च याबाबत माहिती मागविण्यात आली. याअंतर्गत मनपाकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्यान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे २०१२ ते २०१३ या कालावधीत विभागाद्वारे १ लाख २७ हजार रोपटे लावण्यात आली. २०१३-२०१४ या काळात २३ हजार ५२७ वृक्ष लावण्यात आली, तर २०१४ ते २०१५ या कालावधीत केवळ १८ हजार २२१ झाडे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापैकी जिवंत उरलेल्या झाडांबाबत प्राप्त माहितीनुसार २०१२-२०१३ या काळातील केवळ ४८ हजार ७११ झाडे जगू शकल्याचे समजते. २०१३-२०१४ या कालावधीतील केवळ १६०० झाडे जिवंत आहेत, तर २०१४-२०१५ या काळातील केवळ ७८८२ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्षारोपण हे लोकसहभागातून झाल्यामुळे उर्वरित झाडांची माहिती मिळणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लागलेल्या खर्चाबाबत मनपाने संभ्रम निर्माण करणारे उत्तर दिले आहे. उद्यान विभागतर्फे २०१४ ते २०१५ या कालावधीत वृक्षारोपणावर २६ लाख ३६ हजार ९२२ खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आल्याचे कारण देत २०१२-२०१३ आणि २०१३-३०१४ चा खर्च सादरच करण्यात आला नाही. वृक्षलागवडीनंतर झाडे जगविणे शक्य नसल्यास लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. हिरवळीच्या नावाखाली हिरव्या व लाल नोटा खिशात भरण्यासाठीच हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिकेने तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी प्रमोद पांडे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)