शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मोठा दिलासा! समुद्राच्या लाटा वर-खाली होतील, पण 'भारतबुडी'ची भीती कित्येक दशकं नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 13:27 IST

"तापमानामुळे समुद्राची पाणीपातळी वाढेल, लाटा वर- खाली हाेतील; पण शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता पुढची काही दशके तरी नाही" - डाॅ. रविचंद्रन

- निशांत वानखेडे

नागपूर : इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या सहाव्या व सातव्या अहवालात जागतिक तापमानवाढीमुळे मुंबईसह भारतातील अनेक शहरे समुद्राच्या पाण्याखाली येण्याचा धाेका व्यक्त केला आहे. मात्र, भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डाॅ. रविचंद्रन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तापमानामुळे समुद्राची पाणीपातळी वाढेल, लाटा वर- खाली हाेतील; पण शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता पुढची काही दशके तरी नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘लाेकमत’शी बाेलताना डाॅ. रविचंद्रन यांनी एखाद्या रिपाेर्टच्या आकड्यांवर फार विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे सांगत अचूकता महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. आयपीसीसीने अहवालात ज्या शहरांचा उल्लेख केला, त्या भागात समुद्राची भरती नेहमी अधिक असते; पण ती सतत उंचावर राहील, असे नाही. डाॅ. रविचंद्रन यांनी ग्लाेबल वार्मिंगचे परिणाम हाेतील, हे मान्य केले; पण भारतात द्वितीय स्तराचे परिणाम अधिक हाेतील, हे स्पष्ट केले. देशात अत्याधिक पाऊस, अत्याधिक थंडीची वारंवारता वाढेल, वारंवार पूर परिस्थिती निर्माण हाेईल. समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान वाढेल आणि तळाचे पाणी सर्फेसवर पाेहाेचण्यास अडचणी येतील, ज्यामुळे पाेषक तत्वावर परिणाम हाेईल आणि उत्पादकता घटेल. समुद्रातील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याच्या समस्येबाबत केवळ जनजागृतीचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

‘ब्ल्यू इकाॅनाॅमी’ वाढविण्याचे प्रयत्न

भारताला महासागर, समुद्राचा ठेवा मिळाला आहे. या समुद्राचा भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतात. पुड्डुचेरीमध्ये पर्यटनासाठी समुद्र किणारा विकसित केला आहे. अशाप्रकारे सर्वत्र इकाे- टूरिझमला प्राेत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय ऊर्जास्राेताचे संशाेधन, खाेल समुद्रात मासेमारीला प्राेत्साहन देणे, समुद्रातून शुद्ध पाणी निर्मिती करणे आदींसाठी ‘ब्ल्यू इकाॅनाॅमी’ची याेजना आखण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात असा वायू आहे, जाे काढल्यास देशाची उर्जेची गरज भागवली जावू शकते; पण तंत्रज्ञानाअभावी ते शक्य नाही. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डाॅ. रविचंद्रन यांनी स्पष्ट केले.

समुद्राच्या सीमा वाढविण्यासाठी सर्वेक्षण सुरू

अरबी समुद्र, बंगालची खाडी व हिंदी महासागराच्या २०० नाॅटिकल माइल्सपर्यंत भारताचे अधिपत्य आहे. त्यापलीकडे सध्या सर्वांसाठी खुले असून त्यात चिनी अतिक्रमण वाढत आहे. मात्र, भारत सरकारद्वारे २०० च्या पुढे पुन्हा १५० नाॅटिकल माइल्समध्ये सर्वेक्षण आणि संशाेधन केले जात आहे. यानंतर युनाेमध्ये त्याप्रमाणे दावा करून हा समुद्रभाग काबिज करेल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :scienceविज्ञान