शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बारावीच्या परीक्षेचे अनेक पर्याय उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून ...

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या अलर्टनुसार बारावीच्या परीक्षेबाबत साशंकताच आहे. लोकमतने यासंदर्भात शहरातील शिक्षकांकडून मते जाणून घेतली. त्यांचे म्हणणे आहे की बोर्डाने परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. बोर्डाने ठरविल्यास परीक्षा घेण्यासाठी दुसरेही पर्याय उपलब्ध आहेत.

- ५०-५० चा फाॅर्म्युला

सरकार व बोर्ड जर परीक्षेचे आयोजन करीत असेल तर ५०-५० चा फाॅर्म्युला उत्तम आहे. या फाॅर्म्युल्यानुसार ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी व ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करावे. प्रश्नांच्या संख्येनुसार वेळ निर्धारित करावा. या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अधिक वेळ थांबावे लागणार नाही.

आशनारायण तिवारी, प्राचार्य, श्रीमती सी.बी.आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, गांधीबाग

- आंतरिक मूल्यमापनावर घोषित करू शकतात निकाल

राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. जून ते जुलैमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात बोर्डाच्या परीक्षेचे आयोजन करणे अशक्य आहे. सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची सुद्धा रद्द केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांचा निकाल आंतरिक मूल्यमापनावर घोषित केला जाऊ शकतो.

हर्षद घाटोले, शिक्षक, जी.एस. कॉमर्स कॉलेज

- परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे

सद्यस्थितीत बारावीच्या लेखी परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. पण ऑनलाईन परीक्षेचे आयोजन सुद्धा कठीणच आहे. त्यामुळे बोर्डाने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घ्यावी. परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा घ्यावी. परीक्षा ऑफलाईनच व्हायला हवी.

नीलम सोनवानी, श्री गणपती ज्युनिअर कॉलेज, पारडी

- एक पेपर दोन शिफ्टमध्ये व्हावा

बोर्डाने बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या फॉर्म्युल्याच्या आधारे परीक्षा घ्यावी. एकाच विषयाचे दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्न असावेत. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असावा. त्यामुळे एका विषयाचा पेपर दोन शिफ्टमध्ये घेतला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्रावर गर्दी होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होईल.

डॉ. राजेश पशीने, शिक्षक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय