शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

बारावीच्या परीक्षेचे अनेक पर्याय उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून ...

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या अलर्टनुसार बारावीच्या परीक्षेबाबत साशंकताच आहे. लोकमतने यासंदर्भात शहरातील शिक्षकांकडून मते जाणून घेतली. त्यांचे म्हणणे आहे की बोर्डाने परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. बोर्डाने ठरविल्यास परीक्षा घेण्यासाठी दुसरेही पर्याय उपलब्ध आहेत.

- ५०-५० चा फाॅर्म्युला

सरकार व बोर्ड जर परीक्षेचे आयोजन करीत असेल तर ५०-५० चा फाॅर्म्युला उत्तम आहे. या फाॅर्म्युल्यानुसार ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी व ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करावे. प्रश्नांच्या संख्येनुसार वेळ निर्धारित करावा. या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अधिक वेळ थांबावे लागणार नाही.

आशनारायण तिवारी, प्राचार्य, श्रीमती सी.बी.आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, गांधीबाग

- आंतरिक मूल्यमापनावर घोषित करू शकतात निकाल

राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. जून ते जुलैमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात बोर्डाच्या परीक्षेचे आयोजन करणे अशक्य आहे. सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची सुद्धा रद्द केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांचा निकाल आंतरिक मूल्यमापनावर घोषित केला जाऊ शकतो.

हर्षद घाटोले, शिक्षक, जी.एस. कॉमर्स कॉलेज

- परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे

सद्यस्थितीत बारावीच्या लेखी परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. पण ऑनलाईन परीक्षेचे आयोजन सुद्धा कठीणच आहे. त्यामुळे बोर्डाने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घ्यावी. परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा घ्यावी. परीक्षा ऑफलाईनच व्हायला हवी.

नीलम सोनवानी, श्री गणपती ज्युनिअर कॉलेज, पारडी

- एक पेपर दोन शिफ्टमध्ये व्हावा

बोर्डाने बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या फॉर्म्युल्याच्या आधारे परीक्षा घ्यावी. एकाच विषयाचे दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्न असावेत. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असावा. त्यामुळे एका विषयाचा पेपर दोन शिफ्टमध्ये घेतला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्रावर गर्दी होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होईल.

डॉ. राजेश पशीने, शिक्षक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय