शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, कुचेष्टा अन् खोट्या वचनांचं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:19 IST

Nagpur : शेतकरी हा केवळ मतांचा पुरवठादार नाही, तो देशाचा अन्नदाता आहे. त्याला उपहासाचा नव्हे तर सन्मानाचा अधिकार आहे. मंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळायचं ठरवलं असेल, तर या व्यवस्थेतील संवेदना कुठे शोधायच्या? हे वेळीच थांबवायचं की आणखी एक लाख आत्महत्या पाहायच्या, हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

राजेश शेगोकारलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकरी तंबाखू खातो, दारू पिऊन मरतो, कितीही करा, रडतात साले, कर्जमाफी केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची हमी द्या, अशी एक ना अनेक विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार राजकीय नेत्यांनी केला आहे. त्यामध्ये आता थेट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक केली का? कर्जमाफीची रक्कम मुलांच्या लग्न, साखरपुड्यातच उडविली, असा प्रश्न उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. "गरीब की लुगाई, सबकी भोजाई" या न्यायाने जो येतो तो शेतकऱ्यांची चेष्टा, कुचेष्टा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात देशाला शेतकऱ्यांनी सावरले. यावर्षी राज्याचा जो आर्थिक पाहणी अहवालात शेतकऱ्यांनीच राज्याला सावरल्याचे सरकारने मान्य केले. तरीही त्याच सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात, हे लज्जास्पद आहे.

मुळात शेती व शेतकरी यांची दुरवस्था हा अलीकडचा विषय नसला तरी ही दुरवस्था दूर करण्यासाठी झालेले प्रयत्न फलद्रुप झाले नाहीत, हे स्पष्ट होते. त्यामुळे या अपयशाची कारणमीमांसा करताना शेतकऱ्यांच्या नावाने खापर फोडून जबाबदारीतून पळवाट शोधण्याचाच प्रयत्न केला आहे. शेतीमधील घटती उत्पादकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने सर्व मार्ग संपल्यावरच गळफास जवळ केला व देशात गेल्या दहा वर्षात १ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची अधिकृत नोंद आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांचा यज्ञकुंड एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २००१पासून जवळपास ६ हजार १७७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे या आत्महत्यांमागे उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतमालाला मिळत नसल्याने वाढलेला कर्जबाजारीपणा हेच होते. याच थकीत कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी पिचून गेला व कर्जमाफीची आस लावून बसला हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला, परंतु, तसे झाले नाही. देशांतर्गत शेतमालाचे दर वाढले की, निर्यात करणं आणि शेतमालाच्या दरात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं, ही भूमिका बदलली गेली नाही. सध्याच्या बाजारव्यवस्थेत शेतमालाची निर्यात खुली झाली तरी तिचा थेट फायदा शेतकरी घेऊ शकत नाहीत. 

विदर्भातील बहुतांश शेतकरी हा कोरडवाहू शेती करतो. पावसाच्या पाण्यावर सारी भिस्त असते. सिंचनाची सोय असलेल्याही शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही. पिकांच्या दरावर नियंत्रण, सिंचन, खते, बियाणे यांच्या पुरवठ्यातील अडथळे हे प्रश्न कायम असतांना गुंतवणूक कशी करायची? शेतकऱ्यांकडून फक्त जबाबदारीची अपेक्षा आणि सरकारकडून उपेक्षा, हे असंतुलित समीकरणं बदलणार कधी? याची कारणमीमांसा मंत्र्यांनी केली तर 'गुंतवणूक' कोणाची चुकली, हे त्यांनाच कळेल. 

 

 

  • सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भातील कापूस उत्पादकांच्या आहेत. कारण, कापसाचे पीक जवळपास ८ महिने शेतात असते. या पिकाचा उत्पादन खर्च अधिक असून, त्याला बाजारात मिळणारा दर कमी आहे.
  • देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर जागतिक बाजाराला समांतर असतात. कापसाची प्रतिहेक्टर उत्पादकता वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करणे यासाठी सरकार काहीही करायला तयार नाही.
  • कापसाचा उत्पादन खर्च हा त्याच्या एमएसपीपेक्षा अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एमएसपी दराने कापूस विकला तरी त्याच्या पदरात नुकसानच पडते. आता हे लोण सोयाबीन उत्पादकांमध्ये पसरले आहे.
टॅग्स :nagpurनागपूर