शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

दहावीच्या निकालाला होऊ शकतो उशीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST

नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी, विद्यार्थ्यांना गुणदान करायचे आहे. त्यासाठी गुणदानाची प्रक्रिया सुरू आहे. ५ जुलैपर्यंत मूल्यमापनाची ...

नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी, विद्यार्थ्यांना गुणदान करायचे आहे. त्यासाठी गुणदानाची प्रक्रिया सुरू आहे. ५ जुलैपर्यंत मूल्यमापनाची संपूर्ण प्रक्रिया शाळांना करायची आहे. सध्या नागपूर बोर्डाचे मूल्यांकनाचे ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे. शाळांनी वेळेत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास निकालाला उशीर होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२० - २१साठी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या आहेत. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यावे लागणार आहेत. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाईन भरावे लागणार आहेत. ही सर्व प्रक्रिया २ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. याशिवाय शाळानिहाय दहावीच्या गुणांची एकत्रित यादी, विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांकाची हार्ड कॉपी बंद पाकिटात मुख्याध्यापकांना विभागीय बोर्डाकडे पाठवावी लागणार आहे. यासाठी ५ जुलैपर्यंतची तारीख दिलेली आहे. ही पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी अवघे ६ दिवस शिल्लक आहेत. परंतु आतापर्यंत ३१ टक्के विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे.

- नागपूर विभागीय मंडळाच्या मूल्यमापनाचा विद्यार्थीनिहाय आढावा

एकूण परीक्षार्थी - १,५६,५६२

मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झालेले विद्यार्थी - ५८,३१४

मूल्यमापन झाले पण निश्चित केले नाही - ६५,६५८

मूल्यमापन अपूर्ण - ३२,५९०

- मूल्यमापनाच्या प्रक्रियेसंदर्भात बोर्डाने शाळांना वेळापत्रक दिलेले होते. विद्यार्थ्यांचा गुणांचा डाटा ऑनलाईन भरण्यासाठी लिंक दिली होती. अनेक शाळांनी लिंकवर डाटा टाकला आहे, पण तो निश्चित केलेला नाही. तो लवकरात लवकर निश्चित करावा व ज्या शाळांची कामे अपूर्ण आहेत, त्यांनी लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत. तसे आमचे आजपर्यंत ७९.१८ टक्के मूल्यांकनाचे काम झाले आहे.

माधुरी सावरकर, सचिव, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ