शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

संस्कार शिकविणारे मंदिर अखेर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:37 IST

अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा.

ठळक मुद्देनिराधारांचे छत्र हरविले : प्लॅटफॉर्म शाळेची शेवटची घरघरही संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा. परंतु दुर्दैवाने संस्कारचे हे मंदिर अखेर कुलूपबंद झाल्याने शहरातील समाजभान जपणाºयांचे मन गहिवरले. विश्वहिंदू जनकल्याण परिषदेला या रोपट्याचे वटवृक्ष करण्यात अपयश आल्यामुळे, येथे वास्तव्यास असलेल्या निरागस विद्यार्थ्यांचे छत्रच हरविले आहे.लोहमार्ग पोलीस, नागपूर महापालिका व विश्व हिंदू जनकल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया परिसरात २३ जून २०१० साली प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर सुरू करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन अधीक्षक रवींद्र सिंगल यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विश्व हिंदू जनकल्याण परिषदेला या शाळेची जबाबदारी सोपविली होती. एक दोन करता करता प्लॅटफॉर्मवर भटकणारी शेकडो मुले या शाळेत पोलिसांच्या माध्यमातून येत गेली. येथे भटकंती करणाºया मुलांना निवारा मिळाला. त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याची सोय झाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार आणि प्रेमाचा ओलावाही मिळाला. या शिस्तीत ज्यांना आयुष्य घडवायचे होते, ती मुले टिकली आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढे गेली. यातीलच एक उदाहरण म्हणजे बीअरबार मध्ये ग्लास साफ करणारा एक मुलगा आज इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षाला शिकतोय. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी त्यावेळी प्रमुख म्हणून श्रीकांत आगलावे यांना दिली होती. त्यांनी चुकीच्या मार्गावर भटकणाºया मुलांना एका प्रवाहात आणले होते. त्यासाठी समाज भावना जपणाºयांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले होते. मुलांचे पूर्ण नाव व पत्ता नसल्याने, शाळेत दाखल करून घेण्यासाठी वडील म्हणून स्वत:चे नाव लावले होते. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. परंतु गेल्या दीड वर्षांपासून आगलावे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्यामुळे या कार्यातून त्यांना मुक्त करण्यात आले. तेव्हापासून ही जबाबदारी विश्वहिंदू परिषदेच्या जनकल्याण समितीकडे सोपविण्यात आली. ते गेल्यानंतर एक ते दीड वर्षात ही शाळा बंद पडली. एखाद्या संस्थेतला माणूस बदलला की त्या संस्थेची रचना बदलते. तसेच काहीसे या प्लॅटफॉर्म शाळेचे झाले.अतिशय वेदनादायीदु:ख होतेय या शाळेचा शेवट बघून. अनेकांचे शिक्षण पूर्ण झाले नाही. हे विद्यार्थी निदान ते गॅॅ्रज्युएटपर्यंत शिकले असते तर आपल्या पायावर उभे राहू शकले असते. येथे त्यांना घरचे वातावरण मिळाले होते.- श्रीकांत आगलावे, माजी प्रकल्प प्रमुख, प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरबाल कल्याण समितीने तोडले मंदिरशाळेत बाल कल्याण समितीचे लोक आले होते. त्यांनी मुलांची चौकशी केली. मुलांनी बालकल्याण समितीला लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. लहान मुलांना बाल कल्याण समिती घेऊन गेली. दुसºया दिवशी आम्हाला विचारले मोठ्या मुलांना कसे ठेवले. त्यांनाही आमच्या स्वाधीन करा, बाल सुधार गृहात ठेवू असे सांगितले. काही मुलांचे पालक आले. त्यांना त्यांच्या पालकांना हस्तांतरीत केले. ३ ते ४ मुलांना बालकल्याण समितीचे लोक घेऊन गेले. त्याचबरोबर १ तारखेपासून महापालिकेचे सर्व शिक्षा अभियान बंद झाले. त्यामुळे कर्मचाºयांचे पगारही बंद झाले. सोबतच समितीने आमच्याकडे परवानाची विचारणा केली. आमच्याकडे परवाना नव्हता. आम्ही परवान्यासाठी अर्ज केला, तो आला की पुन्हा शाळा सुरू करू.-हरीश हरकरे, कार्याध्यक्ष, विश्व हिंदू परिषद जनकल्याण समिती