शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार शिकविणारे मंदिर अखेर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:37 IST

अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा.

ठळक मुद्देनिराधारांचे छत्र हरविले : प्लॅटफॉर्म शाळेची शेवटची घरघरही संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा. परंतु दुर्दैवाने संस्कारचे हे मंदिर अखेर कुलूपबंद झाल्याने शहरातील समाजभान जपणाºयांचे मन गहिवरले. विश्वहिंदू जनकल्याण परिषदेला या रोपट्याचे वटवृक्ष करण्यात अपयश आल्यामुळे, येथे वास्तव्यास असलेल्या निरागस विद्यार्थ्यांचे छत्रच हरविले आहे.लोहमार्ग पोलीस, नागपूर महापालिका व विश्व हिंदू जनकल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया परिसरात २३ जून २०१० साली प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर सुरू करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन अधीक्षक रवींद्र सिंगल यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विश्व हिंदू जनकल्याण परिषदेला या शाळेची जबाबदारी सोपविली होती. एक दोन करता करता प्लॅटफॉर्मवर भटकणारी शेकडो मुले या शाळेत पोलिसांच्या माध्यमातून येत गेली. येथे भटकंती करणाºया मुलांना निवारा मिळाला. त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याची सोय झाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार आणि प्रेमाचा ओलावाही मिळाला. या शिस्तीत ज्यांना आयुष्य घडवायचे होते, ती मुले टिकली आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढे गेली. यातीलच एक उदाहरण म्हणजे बीअरबार मध्ये ग्लास साफ करणारा एक मुलगा आज इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षाला शिकतोय. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी त्यावेळी प्रमुख म्हणून श्रीकांत आगलावे यांना दिली होती. त्यांनी चुकीच्या मार्गावर भटकणाºया मुलांना एका प्रवाहात आणले होते. त्यासाठी समाज भावना जपणाºयांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले होते. मुलांचे पूर्ण नाव व पत्ता नसल्याने, शाळेत दाखल करून घेण्यासाठी वडील म्हणून स्वत:चे नाव लावले होते. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. परंतु गेल्या दीड वर्षांपासून आगलावे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्यामुळे या कार्यातून त्यांना मुक्त करण्यात आले. तेव्हापासून ही जबाबदारी विश्वहिंदू परिषदेच्या जनकल्याण समितीकडे सोपविण्यात आली. ते गेल्यानंतर एक ते दीड वर्षात ही शाळा बंद पडली. एखाद्या संस्थेतला माणूस बदलला की त्या संस्थेची रचना बदलते. तसेच काहीसे या प्लॅटफॉर्म शाळेचे झाले.अतिशय वेदनादायीदु:ख होतेय या शाळेचा शेवट बघून. अनेकांचे शिक्षण पूर्ण झाले नाही. हे विद्यार्थी निदान ते गॅॅ्रज्युएटपर्यंत शिकले असते तर आपल्या पायावर उभे राहू शकले असते. येथे त्यांना घरचे वातावरण मिळाले होते.- श्रीकांत आगलावे, माजी प्रकल्प प्रमुख, प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरबाल कल्याण समितीने तोडले मंदिरशाळेत बाल कल्याण समितीचे लोक आले होते. त्यांनी मुलांची चौकशी केली. मुलांनी बालकल्याण समितीला लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. लहान मुलांना बाल कल्याण समिती घेऊन गेली. दुसºया दिवशी आम्हाला विचारले मोठ्या मुलांना कसे ठेवले. त्यांनाही आमच्या स्वाधीन करा, बाल सुधार गृहात ठेवू असे सांगितले. काही मुलांचे पालक आले. त्यांना त्यांच्या पालकांना हस्तांतरीत केले. ३ ते ४ मुलांना बालकल्याण समितीचे लोक घेऊन गेले. त्याचबरोबर १ तारखेपासून महापालिकेचे सर्व शिक्षा अभियान बंद झाले. त्यामुळे कर्मचाºयांचे पगारही बंद झाले. सोबतच समितीने आमच्याकडे परवानाची विचारणा केली. आमच्याकडे परवाना नव्हता. आम्ही परवान्यासाठी अर्ज केला, तो आला की पुन्हा शाळा सुरू करू.-हरीश हरकरे, कार्याध्यक्ष, विश्व हिंदू परिषद जनकल्याण समिती