शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

संस्कार शिकविणारे मंदिर अखेर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:37 IST

अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा.

ठळक मुद्देनिराधारांचे छत्र हरविले : प्लॅटफॉर्म शाळेची शेवटची घरघरही संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा. परंतु दुर्दैवाने संस्कारचे हे मंदिर अखेर कुलूपबंद झाल्याने शहरातील समाजभान जपणाºयांचे मन गहिवरले. विश्वहिंदू जनकल्याण परिषदेला या रोपट्याचे वटवृक्ष करण्यात अपयश आल्यामुळे, येथे वास्तव्यास असलेल्या निरागस विद्यार्थ्यांचे छत्रच हरविले आहे.लोहमार्ग पोलीस, नागपूर महापालिका व विश्व हिंदू जनकल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया परिसरात २३ जून २०१० साली प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर सुरू करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन अधीक्षक रवींद्र सिंगल यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विश्व हिंदू जनकल्याण परिषदेला या शाळेची जबाबदारी सोपविली होती. एक दोन करता करता प्लॅटफॉर्मवर भटकणारी शेकडो मुले या शाळेत पोलिसांच्या माध्यमातून येत गेली. येथे भटकंती करणाºया मुलांना निवारा मिळाला. त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याची सोय झाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार आणि प्रेमाचा ओलावाही मिळाला. या शिस्तीत ज्यांना आयुष्य घडवायचे होते, ती मुले टिकली आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढे गेली. यातीलच एक उदाहरण म्हणजे बीअरबार मध्ये ग्लास साफ करणारा एक मुलगा आज इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षाला शिकतोय. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी त्यावेळी प्रमुख म्हणून श्रीकांत आगलावे यांना दिली होती. त्यांनी चुकीच्या मार्गावर भटकणाºया मुलांना एका प्रवाहात आणले होते. त्यासाठी समाज भावना जपणाºयांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले होते. मुलांचे पूर्ण नाव व पत्ता नसल्याने, शाळेत दाखल करून घेण्यासाठी वडील म्हणून स्वत:चे नाव लावले होते. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. परंतु गेल्या दीड वर्षांपासून आगलावे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्यामुळे या कार्यातून त्यांना मुक्त करण्यात आले. तेव्हापासून ही जबाबदारी विश्वहिंदू परिषदेच्या जनकल्याण समितीकडे सोपविण्यात आली. ते गेल्यानंतर एक ते दीड वर्षात ही शाळा बंद पडली. एखाद्या संस्थेतला माणूस बदलला की त्या संस्थेची रचना बदलते. तसेच काहीसे या प्लॅटफॉर्म शाळेचे झाले.अतिशय वेदनादायीदु:ख होतेय या शाळेचा शेवट बघून. अनेकांचे शिक्षण पूर्ण झाले नाही. हे विद्यार्थी निदान ते गॅॅ्रज्युएटपर्यंत शिकले असते तर आपल्या पायावर उभे राहू शकले असते. येथे त्यांना घरचे वातावरण मिळाले होते.- श्रीकांत आगलावे, माजी प्रकल्प प्रमुख, प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरबाल कल्याण समितीने तोडले मंदिरशाळेत बाल कल्याण समितीचे लोक आले होते. त्यांनी मुलांची चौकशी केली. मुलांनी बालकल्याण समितीला लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. लहान मुलांना बाल कल्याण समिती घेऊन गेली. दुसºया दिवशी आम्हाला विचारले मोठ्या मुलांना कसे ठेवले. त्यांनाही आमच्या स्वाधीन करा, बाल सुधार गृहात ठेवू असे सांगितले. काही मुलांचे पालक आले. त्यांना त्यांच्या पालकांना हस्तांतरीत केले. ३ ते ४ मुलांना बालकल्याण समितीचे लोक घेऊन गेले. त्याचबरोबर १ तारखेपासून महापालिकेचे सर्व शिक्षा अभियान बंद झाले. त्यामुळे कर्मचाºयांचे पगारही बंद झाले. सोबतच समितीने आमच्याकडे परवानाची विचारणा केली. आमच्याकडे परवाना नव्हता. आम्ही परवान्यासाठी अर्ज केला, तो आला की पुन्हा शाळा सुरू करू.-हरीश हरकरे, कार्याध्यक्ष, विश्व हिंदू परिषद जनकल्याण समिती