शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तापमान घटले, पावसाचे वातावरण कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

नागपूर : मागील २४ तासातील बदललेल्या वातावरणामुळे विदर्भातील तापमान घटले आहे. दोन दिवसांनंतरही पावसाचे वातावरण कायमच असून नागपुरात वारेही ...

नागपूर : मागील २४ तासातील बदललेल्या वातावरणामुळे विदर्भातील तापमान घटले आहे. दोन दिवसांनंतरही पावसाचे वातावरण कायमच असून नागपुरात वारेही वाहत आहेत. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

मंगळवारी नागपुरात आणि ग्रामीण भागात चांगला पाऊस पडला. मागील २४ तासामध्ये २४ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. यामुळे नागपुरातील तापमानाचा पारा बुधवारी ३५.६ अंशावर आला होता. अमरावती आणि वाशिममध्येही पारा अनुक्रमे ३५ आणि ३५.४ अंश सेल्सिअसवर होता. नागपुरात दिवसभर आकाशात ढग दाटलेले होते. दुपारनंतर काही भागात तुरळक पाऊसही पडला. आर्द्रता सकाळी ८८ टक्के, तर सायंकाळी ७५ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळनंतरही शहरात काही भागात तुरळक पाऊस पडला.

विदर्भात गोंदिया व बुलडाणा येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. अकोल्यात ३७.१, गडचिरोली ३७.६, यवतमाळ ३८.७, वर्धा ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गेल्या २४ तासात नागपूरसह अन्य जिल्ह्यातही वादळी पावसाचे वातावरण होते. अकोलामध्ये १२,८ मि.मी. पाऊस पडला. अमरावतीत ३.४ मि.मी., तर वर्धा येथे ४.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. वादळाने अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या तुटून पडल्या.