शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सांगा, आम्ही काय गुन्हा केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

उमरेड : कोरोनाच्या महामारीत विदारक परिस्थितीत अल्प मानधनावर आम्ही रात्रंदिवस एक करीत सेवाकार्य केले. सेवाभाव जपला. जीव मुठीत ठेवत ...

उमरेड : कोरोनाच्या महामारीत विदारक परिस्थितीत अल्प मानधनावर आम्ही रात्रंदिवस एक करीत सेवाकार्य केले. सेवाभाव जपला. जीव मुठीत ठेवत अनेकांचे प्राण वाचविले. आम्हाला ‘कोरोना योद्धा’ सुद्धा संबोधल्या गेले. आता कोरोना रुग्ण कमी झाले. याकारणावरुन कोविड केअर सेंटर, डीसीएचसी तथा डीसीएच बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यातही कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे, असे आदेशात नमूूद आहे.

खासगी आरोग्य यंत्रणा केवळ पैशात माणुसकी मोजत असताना आम्ही २४ तास सेवाभाव जपला. सांगा, आम्ही काय गुन्हा केला, असा सवाल कोविड सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी विचारीत आहेत. उमरेड तालुक्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद २२ जून २०२० रोजी झाली. त्यानंतर उमरेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह येथे कोविड सेंटर सुरू केले. पहिल्या लाटेत याठिकाणी उत्तम व्यवस्था केल्या गेली. पहिली लाट ओसल्यानंतर हे सेंटर बंद करीत उमरेड तालुक्यातील रुग्णांना भिवापूरच्या ट्रामा सेंटरमध्ये हलविल्या जात होते. लोकमतने या गंभीर प्रश्नाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले. त्यानंतर २३ मार्च २०२१ ला स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे कसेबसे कोविड सेंटर सुरू झाले. अशातच नूतन आदर्श महाविद्यालयातील क्रीडा संकुलात ८० बेडचे कोविड सेंटर सुरू झाले. या संपूर्ण कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ७३१ कोरोना रुग्णांवर औषधोपचार केल्या गेले. बऱ्याचदा मोठे अधिकारी नसतानाही अटीतटीच्या परिस्थितीत कंत्राटी मनुष्यबळाने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली आहे. अंगावर काटा आणणारे अनेक प्रसंग या कर्मचाऱ्यांच्या सोबतीला आहेत. आता काम कमी झाले म्हणून कंत्राटी मनुष्यबळास कामावरून कमी करा असा आदेश अन्यायच असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत तातडीने निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.

या चमूने लढविला किल्ला

उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये एकूण १३ परिचारिका, ३ वैद्यकीय अधिकारी, तसेच फॉर्मासिस्ट, टाटा एन्ट्री ऑपरेटर, लेबॉरेटरी तंत्रज्ञ प्रत्येकी एक आणि तीन वॉर्डबॉय कंत्राटी म्हणून कर्तव्य पार पाडत होते. या संपूर्ण चमूने जीवाची बाजी लावत कोरोना रुग्णांवर उपचार केला. उत्तम पद्धतीने किल्ला लढविला. त्यांच्या कार्याचे कौतुक अनेक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. शिवाय आ. राजू पारवे यांनी सुद्धा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते.

तिसरी लाट आल्यास

प्रशासनाची पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत तारांबळ उडाली होती. काही खासगी कोविड सेंटरमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारणीच्या अनेक तक्रारी झाल्यात. शिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुद्धा उजेडात आला. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांना बेड मिळाले नाहीत. औषधोपचार वेळीच न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अशा कठिण परिस्थितीत दुसरी लाट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कशीबशी आटोक्यात आली. असे असले तरी तिसरी लाट आल्यास पुन्हा नागरिकांची गैरसोय होईल, असे बोलले जात असून आरोग्य विभागाच्या आदेशामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आदेश रद्द करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.