शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शिक्षकांच्या डोई अशैक्षणिक कामाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:06 IST

नागपूर : देशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू होऊन दशक उलटले. परंतु त्यामधील शिक्षकांना अशैक्षणिक ...

नागपूर : देशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू होऊन दशक उलटले. परंतु त्यामधील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्ती देण्याबाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी मात्र अजूनही होताना दिसत नाही. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांच्या डोई अजूनही मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामाचा भार असून, शिक्षकांना शिक्षण सोडून सर्वकाही करावे लागते आहे.

या अशैक्षणिक कामाची व्याप्ती बघितली तर या शिक्षकांची नियुक्ती विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता झाली की अशैक्षणिक कामे करण्यासाठी झाली असा प्रश्न पडतो. या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून त्याचा परिणाम शाळांच्या पटसंख्येवर सुद्धा होतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मोडकळीस येण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. पण शिक्षण विभागाचे यावर ‘नो कमेंट’ आहे.

- दृष्टिक्षेपात

जिल्हा परिषदेच्या शाळा - १५३०

एकूण शिक्षक - ४४००

नियमित मुख्याध्यापक असलेल्या शाळा - ८५

- मुख्याध्यापक म्हणजे ‘मोबाईल टीचर’

जिल्हा परिषदच्या मोठ्या संख्येने शाळा द्विशिक्षकी आहे. त्यापैकी एकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार असतो. मुख्याध्यापक म्हणून एका शिक्षकाला तर माहितीचे संकलन करणे, अहवाल देणे, सभेला जाणे याकरिता कार्यालयात चकराच माराव्या लागतात. खऱ्या अर्थाने तो मोबाईल टीचर म्हणजे फिरता शिक्षकच असतो.

- ऐकावे ते नवलच !

अलीकडेच औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात नदीच्या पात्रातील वाळू चोरी पकडण्यासाठी तर रत्नागिरी जिल्ह्यात धरण गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांच्या ड्युट्या लावल्या होत्या. तर मागील वर्षी काही जिल्ह्यात कोरोना मोहिमेंतर्गत दारू दुकानापुढील गर्दी नियंत्रणाकरिताही गुरुजींना उभे करण्यात आले होते.

- आम्हाला शिकवू द्या, ही एकच मागणी

विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे हे शिक्षक म्हणून आमचे आद्य कर्तव्य आहे. परंतु अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागतात. स्वतंत्र मुख्याध्यापक नसल्याने आजी माजी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचे दाखले व इतर दाखले देणे अशी अनेक कामे असतात. त्यामुळे शिक्षक शैक्षणिक कामापासून परावृत्त होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते.

अशोक तोंडे , शिक्षक, पं.स. भिवापूर

- निवडणूक , जनगणना व आपत्ती व्यवस्थापनाची कामे या व्यतिरिक्त कोणतेही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये अशी स्पष्ट तरतुद शिक्षण हक्क कायद्यात असली तरी त्याबाबीचे सर्रास उल्लंघन शासन, प्रशासनाकडून केले जाते. त्यासाठी प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर केला जातो. हे थांबले पाहीजे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास साधायचा असेल तर शिक्षकांना अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्ती द्यायला हवी.

अनिल नासरे , जिल्हा सरचिटणीस

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर

- शिक्षकांची कामे

१) शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी

२) मतदार नोंदणी पुनर्निरीक्षण

३) शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ , दक्षता समिती , शापोआ समिती अशा विविध समित्यांच्या सभा घेणे व इतिवृत लिहणे.

४) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम राबविणे

५) विविध शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरणे.

६) विविध अभियान राबविणे

७) आरोग्य विभागाच्या विविध मोहिमांची जनजागृती व सहभाग

८) शालेय प्रशासकीय दप्तर सांभाळणे

९ ) विद्यार्थी दाखल - खारीज संदर्भातील कार्यालयीन कामे

१०) विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहितीची नोंद करणे

११) ग्रामसभा घेणे

१२) विविध शासकीय योजनांकरीता सर्वेक्षण करणे

१३) शाळेला प्राप्त निधीचा जमाखर्च नोंदविणे ,लेखे सांभाळणे

१४) मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे कार्यभार सांभाळणे.

१५) दरवर्षी गाव सर्वेक्षण करणे

- मागील वर्षीपासून कोरोना संदर्भाने करावी लागणारी कामे

गाव सर्वेक्षण

कोरोना चाचणी केंद्रावर ड्युटी

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केंद्रावर ड्युटी

राशन दुकानावर ड्युटी

महामार्ग वाहतुक तपासणी पथक

विलगीकरण कक्ष

कोरोना नियंत्रण केंद्र, तहसिल कार्यालय

लसीकरण केंद्र

लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम