शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबतचे नवीन धोरण शिक्षण विभागाकडून आखण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबतचे नवीन धोरण शिक्षण विभागाकडून आखण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरून शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याची योजना असून, विद्यार्थ्यांच्या चाचणीतील गुणांवरून शिक्षक कितपत प्रशिक्षित आहेत व ते त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अध्यापन करताना कसा उपयोग करतात, यावरून शिक्षकांचे मूल्यांकन केले जाणार आहे आणि यावरूनच शिक्षकांचे वेतनही निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी एक त्रयस्थ संस्था नेमण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

ही बाब सध्या सोशल मीडियावरून चांगलीच व्हायरल होत असून, शासनाच्या या धोरणाबाबत शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये तीव्र असंतोष असून, शिक्षक संघटनांकडूनही या धोरणाला विरोध केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सर्वंकष विचार न करता, विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी बनवणे आणि त्यासाठी एक सामान्य परीक्षा घेऊन त्या परीक्षांच्या निकालावरुन शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनवाढीबाबतचा निर्णय घेणे ही बाब अत्यंत चुकीची आहे.

शिक्षकांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होते का? अध्ययन सहज सुलभ होते का? याचे मूल्यमापन करण्यासाठी शासनाकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धत अथवा यंत्रणा उपलब्ध नाही. शिक्षकांचे वेतन वेळेवर न देणाऱ्या शासनाचा शिक्षकांचे वेतन कमी करण्याचा हा छुपा डाव आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षक संघटनांकडून शासनाच्या या धोरणाला विरोध करण्यात येत आहे.

- उच्चभ्रू वस्तीतील शाळेत जाणाऱ्या मुलांची तुलना डिप्टी सिग्नल, हसनबाग, नंदनवन झोपडपट्टी किंवा गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी होऊच शकत नाही. दोन्ही भागात अध्यापन करणारे शिक्षक सारखेच ठेवले तरी दोन्हीकडील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये नक्कीच फरक असणार आहे. असे असताना झोपडपट्टी भागात, कामगार वस्तीत कार्यरत शिक्षकांच्या वेतनात कपात केली जाणार आणि रामदासपेठ, धंतोली, धरमपेठ, रामनगर परिसरात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची वेतन कपात होणार नाही. यातून शासन शिक्षकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम करत आहे. याकडे शिक्षण विभाग सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.

योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

- विद्यार्थ्यांचा बुध्यांक, पालकांची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती, शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधा, घरचे कौटुंबिक व शैक्षणिक वातावरण या सर्वच बाबींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. त्यामुळे केवळ शिक्षकांना जबाबदार धरून त्यांचे वेतन कमी करणे ही बाब योग्य नाही.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर