शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबतचे नवीन धोरण शिक्षण विभागाकडून आखण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबतचे नवीन धोरण शिक्षण विभागाकडून आखण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरून शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याची योजना असून, विद्यार्थ्यांच्या चाचणीतील गुणांवरून शिक्षक कितपत प्रशिक्षित आहेत व ते त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अध्यापन करताना कसा उपयोग करतात, यावरून शिक्षकांचे मूल्यांकन केले जाणार आहे आणि यावरूनच शिक्षकांचे वेतनही निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी एक त्रयस्थ संस्था नेमण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

ही बाब सध्या सोशल मीडियावरून चांगलीच व्हायरल होत असून, शासनाच्या या धोरणाबाबत शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये तीव्र असंतोष असून, शिक्षक संघटनांकडूनही या धोरणाला विरोध केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सर्वंकष विचार न करता, विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी बनवणे आणि त्यासाठी एक सामान्य परीक्षा घेऊन त्या परीक्षांच्या निकालावरुन शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनवाढीबाबतचा निर्णय घेणे ही बाब अत्यंत चुकीची आहे.

शिक्षकांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होते का? अध्ययन सहज सुलभ होते का? याचे मूल्यमापन करण्यासाठी शासनाकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धत अथवा यंत्रणा उपलब्ध नाही. शिक्षकांचे वेतन वेळेवर न देणाऱ्या शासनाचा शिक्षकांचे वेतन कमी करण्याचा हा छुपा डाव आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षक संघटनांकडून शासनाच्या या धोरणाला विरोध करण्यात येत आहे.

- उच्चभ्रू वस्तीतील शाळेत जाणाऱ्या मुलांची तुलना डिप्टी सिग्नल, हसनबाग, नंदनवन झोपडपट्टी किंवा गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी होऊच शकत नाही. दोन्ही भागात अध्यापन करणारे शिक्षक सारखेच ठेवले तरी दोन्हीकडील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये नक्कीच फरक असणार आहे. असे असताना झोपडपट्टी भागात, कामगार वस्तीत कार्यरत शिक्षकांच्या वेतनात कपात केली जाणार आणि रामदासपेठ, धंतोली, धरमपेठ, रामनगर परिसरात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची वेतन कपात होणार नाही. यातून शासन शिक्षकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम करत आहे. याकडे शिक्षण विभाग सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.

योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

- विद्यार्थ्यांचा बुध्यांक, पालकांची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती, शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधा, घरचे कौटुंबिक व शैक्षणिक वातावरण या सर्वच बाबींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. त्यामुळे केवळ शिक्षकांना जबाबदार धरून त्यांचे वेतन कमी करणे ही बाब योग्य नाही.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर