शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रदूषण पसरविणार्‍यांवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: May 31, 2014 00:54 IST

यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी शहरातील वातावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे उद्योग व कोळसा वखारी आणि रस्ते खराब करणार्‍या ओव्हरलोड ट्रक्सवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

हरित लवादाचा आदेश नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी शहरातील वातावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे उद्योग  व  कोळसा वखारी आणि रस्ते खराब करणार्‍या ओव्हरलोड ट्रक्सवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण  मंडळ, उपविभागीय दंडाधिकारी व प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे नियमित कठोर  कारवाई करावी, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत. तसेच, यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांना दर महिन्याला कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा  आणि जिल्हाधिकार्‍यांनी यासह आरोग्य व कृषी विभागाच्या अहवालाचा दर तीन महिन्यांनी  आढावा घ्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.  कोळसा उत्खनन, वाहतूक,  साठवणूक व जड वाहतुकीमुळे वणी शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने  पत्रकार दिलीप भोयर यांनी सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित  याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने पर्यावरणाशी संबंधित विषय असल्यामुळे ही याचिका १९ सप्टेंबर २0१३  रोजीच्या आदेशान्वये हरित लवादाकडे स्थानांतरित केली होती.    लवादाच्या पुणे खंडपीठाचे  न्यायिक सदस्य व्ही. आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी हा विषय विविध  आदेश देऊन नुकताच निकाली काढला आहे. वणी रेल्वे स्थानकावरील कोळसा सायडिंगवर अयोग्य पद्धतीने कोळसा उतरविला व भरला जातो.  वेकोलि, बी. एस. इस्पात व वैनगंगा स्टील या कंपन्या लालपुरिया परिसरात अवैज्ञानिक पद्धतीने  कोळसा साठवणूक व उत्खनन करतात. यामुळे वणी शहरातील वायू व पाणी प्रदूषणात प्रचंड वाढ  झाली आहे. नागरिकांचे आरोग्य व शेतीवर प्रदूषणाचा गंभीर परिणाम होत आहे. तालुका आरोग्य  अधिकार्‍यांनी ६ फेब्रुवारी २00९ रोजी उपविभागीय अधिकार्‍यांना पत्र लिहून वणी कोळसा  सायडिंग व लालपुरिया भागातील कोळसा वखारी रहिवासी भागापासून दोन किलोमीटर लांब  स्थानांतरित करण्याची विनंती केली होती. तसेच, तालुका कृषी अधिकार्‍यांनी २0११-१२ मध्ये  कोळसा प्रदूषणामुळे शेतीवर होणार्‍या परिणामाचे मूल्यांकन केले होते. त्यात ३१ गावांतल्या  शेतीतील पिके कोळसा प्रदूषणामुळे प्रभावित झाल्याचे आढळून आले होते. कोळसा वाहतुकीमुळे  वणी येथील मुख्य रस्ते खराब झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने २२ नोव्हेंबर २0१२  रोजीच्या पत्रान्वये रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे १00 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट  केले होते, अशी माहिती याचिकेद्वारे सादर करण्यात आली होती.