शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मोर्चेकऱ्यांची योग्य काळजी घ्या

By admin | Updated: December 9, 2014 00:58 IST

अधिवेशन कालावधीत अनेक जिल्ह्यांतून मोर्चे येतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची योग्य काळजी घेण्यात यावी, तसेच मंत्रिमहोदयांनी मोर्चाला भेट देण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे,

सभापती-अध्यक्षांच्या सूचना : घेतला व्यवस्थेचा आढावा नागपूर : अधिवेशन कालावधीत अनेक जिल्ह्यांतून मोर्चे येतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची योग्य काळजी घेण्यात यावी, तसेच मंत्रिमहोदयांनी मोर्चाला भेट देण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे दिल्या. उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबतचा आढावा आज रविवारी त्यांनी संयुक्तपणे घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होेते. विधानभवनाच्या मंत्री परिषद दालनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, तसेच इतर विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी मोर्चेकरी आणि मंत्र्यांच्या भेटीची वेळ जुळेल या पद्धतीने नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर जे मोर्चेकरी रात्री मुक्कामी राहतील, त्यांच्या निवासाची व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली असून, त्या ठिकाणी मोबाईल प्रसाधनगृह आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी दिली. (प्रतिनिधी) भोजनाची गुणवत्ता राखा आमदार निवासामध्ये चांगले जेवण मिळत नाही, अशी आमदारांची तक्रार असते. यावर्षी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अधूनमधून भेटी द्याव्यात. भोजनाची गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदाराला तसे निर्देश द्यावेत. तसेच अधिवेशन कालावधीत सुरक्षेसाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येते. मात्र या कर्मचाऱ्यांचे निवास व भोजन व्यवस्था नीट नसल्याच्या बातम्या माध्यमातून येतात. तेव्हा यावर्षी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करताना याची नीट काळजी घ्यावी, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिल्या.