शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

पाेत सांभाळण्यासाठी जमिनीची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत ...

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत कसा सांभाळायचा, ताे सांभाळताना नेमकी काेणती काळजी घ्यायची यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागतिक मृदा दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. शिवाय, जमिनीचा पाेत सांभाळण्याचे आवाहनही केले.

रामटेक तालुक्यातील काचूरवाही येथील बाजार चाैकात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नारायण ताेडमल, देवेंद्र गाेल्हर, रमेश नाटकर, गजानन भलमे, रवींद्र माेहनकर, सुदाम धुर्वे, गाैतम चरडे, खेमराज बावनकुळे, लहू बावनकुळे, शुभम कांबळे, प्रशांत आबागडे, प्रणित बावनकुळे, मधुकर माेहनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. रामटेक तालुका कृषी अधिकारी कार्यलयाच्यावतीने किरणापूर, चाेखाळासह अन्य गावांमध्यही कार्यक्रम घेण्यात आले.

नरखेड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील वडेगाव (उमरी) व नायगाव येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी,तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे, दिलीप हिवरकर, वडेगावचे सरपंच रुपेश मुंदाफळे, नायगावचे किसना उईके, गणेश नाकाडे,घनश्याम ठाकरे, नत्थू ढाेपरे, प्रवीण बेलखडे, कृषी सहायक अमित वानखेडे, लांडे, खडतकर, शगहूकर, खसारे, निमजे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.

बाजारगाव येथील गाेपाळपुरी येथेही कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच तुषार चाैधरी, रेखा गावंडे, रिता तिवारी, मंडळ कृषी अधिकारी बी. आर. गाैरखेडे, ज्याेती बाेडखे, कविता मुरकुटे, आशिष भगत यांच्यासह बाजारगाव, शिवा, पांजरा, सावंगा येथील शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते. संचालन ए. एन.रंधे यांनी केले तर पी. जी. राठाेड यांची आभार मानले.

---

माती परीक्षण महत्त्वाचे

काेणतेही पीक घेताना आधी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीत काेणते घटक कमी व काेणते अधिक आहे, याची माहिती मिळते. शिवाय, काेणत्या पिकाला काेणत्या घटकाची आवश्यकता आहे, याची माहिती हाेत असल्याने ते घटक पिकांना देणे सहज शक्य हाेते. त्यातून उत्पादकता वाढण्यास मदत हाेते. परीक्षणामुळे माती व पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ कळते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.