शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाेत सांभाळण्यासाठी जमिनीची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत ...

रामटेक/ जलालखेडा/ बाजारगाव : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला असून, पिकांची उत्पादकताही घटत चालली आहे. जमिनीचा पाेत कसा सांभाळायचा, ताे सांभाळताना नेमकी काेणती काळजी घ्यायची यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागतिक मृदा दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले. शिवाय, जमिनीचा पाेत सांभाळण्याचे आवाहनही केले.

रामटेक तालुक्यातील काचूरवाही येथील बाजार चाैकात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नारायण ताेडमल, देवेंद्र गाेल्हर, रमेश नाटकर, गजानन भलमे, रवींद्र माेहनकर, सुदाम धुर्वे, गाैतम चरडे, खेमराज बावनकुळे, लहू बावनकुळे, शुभम कांबळे, प्रशांत आबागडे, प्रणित बावनकुळे, मधुकर माेहनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. रामटेक तालुका कृषी अधिकारी कार्यलयाच्यावतीने किरणापूर, चाेखाळासह अन्य गावांमध्यही कार्यक्रम घेण्यात आले.

नरखेड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील वडेगाव (उमरी) व नायगाव येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी,तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे, दिलीप हिवरकर, वडेगावचे सरपंच रुपेश मुंदाफळे, नायगावचे किसना उईके, गणेश नाकाडे,घनश्याम ठाकरे, नत्थू ढाेपरे, प्रवीण बेलखडे, कृषी सहायक अमित वानखेडे, लांडे, खडतकर, शगहूकर, खसारे, निमजे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.

बाजारगाव येथील गाेपाळपुरी येथेही कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच तुषार चाैधरी, रेखा गावंडे, रिता तिवारी, मंडळ कृषी अधिकारी बी. आर. गाैरखेडे, ज्याेती बाेडखे, कविता मुरकुटे, आशिष भगत यांच्यासह बाजारगाव, शिवा, पांजरा, सावंगा येथील शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते. संचालन ए. एन.रंधे यांनी केले तर पी. जी. राठाेड यांची आभार मानले.

---

माती परीक्षण महत्त्वाचे

काेणतेही पीक घेताना आधी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीत काेणते घटक कमी व काेणते अधिक आहे, याची माहिती मिळते. शिवाय, काेणत्या पिकाला काेणत्या घटकाची आवश्यकता आहे, याची माहिती हाेत असल्याने ते घटक पिकांना देणे सहज शक्य हाेते. त्यातून उत्पादकता वाढण्यास मदत हाेते. परीक्षणामुळे माती व पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ कळते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांवर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.