शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

स्वाईन फ्लूने गाठली शंभरी

By admin | Updated: May 28, 2017 02:31 IST

उन्हाळा संपायला आला असताना स्वाईन फ्लूची दहशतही कमी होत चालली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे शंभर रुग्ण आढळून आले

२७ रुग्णांचा मृत्यू : रोगाचा जोर होत आहे कमी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळा संपायला आला असताना स्वाईन फ्लूची दहशतही कमी होत चालली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे शंभर रुग्ण आढळून आले असून २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात लहान मुलांची संख्या सहा असून उर्वरित मृतांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यापासून या रोगाचे रुग्ण कमी झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात हा आजार वाढण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती नाजूक बनली होती. वाढत्या तापमानात स्वाईन फ्लूचा विषाणू तग धरत नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्याच्या आतापर्यंत या विषाणूची अनेकांना लागण झाल्याचे सामोर आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्वाईन फ्लू बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. रुग्णाची संख्या २०वर पोहचली आहे. तर नागपूर विभागात ही संख्या शंभरावर गेली आहे. यात नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात स्वाईन फ्लूमुळे झालेले बहुतांश मृत्यू हे खासगी रुग्णालयांमध्ये झाले आहेत. श्वसन रोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी ‘लोकमत’ला सांगितले, २०१० नंतर २०१२, २०१५ व आता २०१७ मध्ये सर्वाधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले. या वर्षी पहिल्यांदाच उन्हाळ्यात मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले. परंतु गेल्या दोन आठवड्यापासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे पावसाळ्यात याचे रुग्ण कमी दिसण्याची शक्यता आहे. परंतु तरीही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे.