शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

संगणक परिचालकांच्या मोर्चाने फोडला घाम

By admin | Updated: December 12, 2014 00:29 IST

महाआॅनलाईन कंपनी ही ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याने ही कंपनी बंद करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातून तीन हजाराच्यावर युवा

तीन हजारांवर आंदोलनकर्ते : कठडे तोडले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन नागपूर : महाआॅनलाईन कंपनी ही ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याने ही कंपनी बंद करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातून तीन हजाराच्यावर युवा संगणक परिचालकांनी आज गुरुवारी विधानभवनावर धडक दिली. टेकडी रोडवर हा मोर्चा अडविताच मोर्चेकऱ्यांनी कठडे तोडून रस्त्यावर उतरले. यामुळे दिवसभर तणावाचे वातावरण होते. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनालाही मोर्चकरांनी दाद दिली नाही. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही, या अटीवर रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. संगणक परिचालक संघटनेच्या या मोर्चाने पोलिसांना चांगलाच घाम फोडला. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालय ‘ईपीआरआय’ हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. राज्य शासन व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस यांची अंगभूत संयुक्त कंपनी म्हणून महाआॅनलाईन कंपनीला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदस्तरावर डाटा एन्ट्री करण्याचे काम दिले आहे. यासाठी मदत घेण्यात येणाऱ्या संगणक परिचालकाला ठरवून दिल्याप्रमाणे आठ हजार रुपये मानधन देण्याचे आदेश आहेत. संघटनेचे सचिव सिद्धेश्वर मुंडे यांच्या मते, कंपनी हे मानधन न देता साडेतीन ते चार हजार रुपये मानधन देते. शासनाचे आदेश नसताना कंपनी महिन्याकाठी ४५० डाटा एंट्री करणे सक्तीचे करते. असे न केल्यास मानधन काढत नाही. याविरोधात राज्यभरातील संगणक परिचालक संघटनेने आंदोलन केले, मात्र ग्रामविकास मंत्रालयाने याची दखल न घेता उलट आॅपरेटर्सना नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश दिले. परिणामी संतप्त झालेल्या तीन हजाराच्यावर संगणक परिचालकांनी आज विधानभवनावर धडक दिली. एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या मोर्चेकरांसमोर पोलिसांची संख्या तोकडी पडली. त्यांनी आल्याआल्या कठडे तोडून विधानभवनाकडे धावत सुटले, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत समोर कठडे लावून मोर्चेकरांना रोखले. मोर्चेकऱ्यांमध्ये वाढता असंतोष लक्षात घेऊन खुद्द ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर मोर्चाला समोर गेले. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु तोंडी नको लेखी आश्वासन द्या, या मोर्चेकरांच्या मागणीपुढे मंत्र्यांचे काहीच चालले नाही. शेवटी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत थंडीत हे आंदोलन सुरू होते.नेतृत्वविशाल चिखलीकर, बिट्टू रावेकर, सिद्धेश्वर मुंडे, कमलेश गमे, सोनु तितरमारे, पराग दांडेकर, प्रफुल्ल जाधव.मागण्याआर्थिक, मानसिक शोषण करणारी महाआॅनलाईन कंपनी बंद करा.संगणक परिचालकांना जिल्हा परिषदमार्फत शासन सेवेत समाविष्ट करा.महाआॅनलाईन कंपनीची चौकशी करा.