शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची - सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन ...

देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची

- सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्तमानात युवकांमध्ये देशभक्तीची भावना ढासळत चालली आहे. ही उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांची विचारधारा सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी केले.

युवकांसाठी देशभक्तीची भावना प्रसारित करणाऱ्या आणि नवलेखकांना लिहिते करणाऱ्या ‘युवा शंखनाद’ या त्रैमासिक विचार पत्राचे विमोचन शनिवारी सीताबर्डी येथील सेवासदन सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आनंद कुमार आभासी माध्यमातून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एनएडीटीचे असिस्टंट डायरेक्टर डॉ. ऋषी बिसेन, युवा शंखनादचे पालक प्रतीक दोषी व संयोजक धर्मेंद्र तुरकर उपस्थित होते. आभासी माध्यमाद्वारे विवेकानंद केंद्र, ओडिशाचे प्रांत संघटक रवी नायडू, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते.

‘जहाँ चाह, वहा राह’ हे विचार लहानपणी वाचले आणि स्वतःतील क्षमतेचा परिचय होत गेला. पुढे आयुष्यात आलेल्या संघर्षाच्या समयी, स्वामीजींचे हेच विचार माझे मार्गदर्शक ठरले. आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे, तरुण रक्ताविषयी शंका नाही. मात्र, देश घडवायला गिधाडे नकोत तर काही करू इच्छिणाऱ्या रक्ताच्या युवकांची देशाला गरज आहे. तेव्हाच जेएनयूमधील प्रकारांना आळा बसेल. त्यासाठी हा शंखनाद महत्त्वाचा असल्याचे आनंद कुमार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता देशकर यांनी केले. प्रास्ताविक धर्मेंद्र तुरकर यांनी केले, तर आभार श्रेयस यांनी मानले.