शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

‘स्वाधार’ विद्यार्थ्यांना नाही आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

कसे शिकणार मागासवर्गीय विद्यार्थी : खर्च केवळ कागदोपत्री, विद्यार्थ्यांच्या खात्यात काहीच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वसतिगृहात ...

कसे शिकणार मागासवर्गीय विद्यार्थी :

खर्च केवळ कागदोपत्री, विद्यार्थ्यांच्या खात्यात काहीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे; परंतु दोन-दोन वर्षे विद्यार्थ्यांना निधीच मिळत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी भाड्याने राहून शिकणार तरी कसे? नियोजनाचा अभाव व शासनाचे दुर्लक्ष यामुळे ‘स्वाधार’चा विद्यार्थ्यांना आधार मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आहे. २०१६-१७ मध्ये एकूण १५ हजार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होते; परंतु ३,२५५ विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळू शकला. त्यानंतर केवळ १६७९ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. सन २०१९-२० या वर्षात राज्यातील १७,१०० विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. यासाठी ६० कोटींची तरतूद होती. ५७.५५ कोटी रुपये खर्च झाल्याचे सरकारी आकडेवारी दाखवते; मात्र वास्तवात दुसरा हप्ता विद्यार्थ्यांना अजूनही मिळालेला नाही. तसेच सन २०२०-२१ या वर्षात १४,९०८ लाभार्थी असून, यासाठी ७५ कोटी तरतूद आणि खर्च ७३.७३ कोटी रुपये जवळजवळ सर्व पैसे खर्च झालेत; मात्र या वर्षात तर दोन्ही हप्ते विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. या योजनांसाठी २०१७ ते २०२१ पाच वर्षांसाठी ४२१.७७ कोटी रुपये इतकी भरीव तरतूद केली होती; पण प्रशासनाची उदासिनता, राजकीय मंडळींची अनास्था, विद्यार्थी व सामाजिक चळवळीतील लोकांचे दुर्लक्ष यामुळे सध्या ही योजनाच डबघाईला आली आहे. तसे पाहिले तर मागील दोन वर्षात शिष्यवृत्तीसाठीच्या बजेटमध्ये वाढ होतेय, त्याचा खर्चही होतोय; परंतु विद्यार्थ्यांच्या खात्यात मात्र पैसे जमा झालेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

- अशी आहे योजना

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद या विभागीय शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये मिळतात. तसेच महसूल विभागाचे शहर व क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये आणि जिल्ह्याचे ठिकाण व महानगरपालिका हद्दीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यात घरभाडे, भोजन आणि निर्वाह भत्ता याचा समावेश आहे.

- दोन वर्षांपूर्वीच्या निधीचे आता वाटप

विद्यार्थ्यांना घरभाडे हे प्रत्येक महिन्याला भरावे लागते. जेवनाचा खर्च वेगळा. तसेच शैक्षणिक साहित्याची खरेदी नगदीच करावी लागते. शासनातर्फे दोन वर्षांपूर्वीचा निधी आता वाटप केला जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी खरच भाड्याने खोली करून कसे शिकणार?

- बॉक्स

राज्य सरकार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृह उभारू शकले नाही. त्यामुळे त्यांना स्वाधारसारखी योजना आणावी लागली; परंतु नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे ही योजनासुद्धा अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वाधारपेक्षा वसतिगृहांची निर्मिती करावी.

- अतुल खोब्रागडे

सामाजिक कार्यकर्ते.