शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाधार’ विद्यार्थ्यांना नाही आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

कसे शिकणार मागासवर्गीय विद्यार्थी : खर्च केवळ कागदोपत्री, विद्यार्थ्यांच्या खात्यात काहीच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वसतिगृहात ...

कसे शिकणार मागासवर्गीय विद्यार्थी :

खर्च केवळ कागदोपत्री, विद्यार्थ्यांच्या खात्यात काहीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे; परंतु दोन-दोन वर्षे विद्यार्थ्यांना निधीच मिळत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी भाड्याने राहून शिकणार तरी कसे? नियोजनाचा अभाव व शासनाचे दुर्लक्ष यामुळे ‘स्वाधार’चा विद्यार्थ्यांना आधार मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आहे. २०१६-१७ मध्ये एकूण १५ हजार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होते; परंतु ३,२५५ विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळू शकला. त्यानंतर केवळ १६७९ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. सन २०१९-२० या वर्षात राज्यातील १७,१०० विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. यासाठी ६० कोटींची तरतूद होती. ५७.५५ कोटी रुपये खर्च झाल्याचे सरकारी आकडेवारी दाखवते; मात्र वास्तवात दुसरा हप्ता विद्यार्थ्यांना अजूनही मिळालेला नाही. तसेच सन २०२०-२१ या वर्षात १४,९०८ लाभार्थी असून, यासाठी ७५ कोटी तरतूद आणि खर्च ७३.७३ कोटी रुपये जवळजवळ सर्व पैसे खर्च झालेत; मात्र या वर्षात तर दोन्ही हप्ते विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. या योजनांसाठी २०१७ ते २०२१ पाच वर्षांसाठी ४२१.७७ कोटी रुपये इतकी भरीव तरतूद केली होती; पण प्रशासनाची उदासिनता, राजकीय मंडळींची अनास्था, विद्यार्थी व सामाजिक चळवळीतील लोकांचे दुर्लक्ष यामुळे सध्या ही योजनाच डबघाईला आली आहे. तसे पाहिले तर मागील दोन वर्षात शिष्यवृत्तीसाठीच्या बजेटमध्ये वाढ होतेय, त्याचा खर्चही होतोय; परंतु विद्यार्थ्यांच्या खात्यात मात्र पैसे जमा झालेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

- अशी आहे योजना

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद या विभागीय शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये मिळतात. तसेच महसूल विभागाचे शहर व क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये आणि जिल्ह्याचे ठिकाण व महानगरपालिका हद्दीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यात घरभाडे, भोजन आणि निर्वाह भत्ता याचा समावेश आहे.

- दोन वर्षांपूर्वीच्या निधीचे आता वाटप

विद्यार्थ्यांना घरभाडे हे प्रत्येक महिन्याला भरावे लागते. जेवनाचा खर्च वेगळा. तसेच शैक्षणिक साहित्याची खरेदी नगदीच करावी लागते. शासनातर्फे दोन वर्षांपूर्वीचा निधी आता वाटप केला जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी खरच भाड्याने खोली करून कसे शिकणार?

- बॉक्स

राज्य सरकार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृह उभारू शकले नाही. त्यामुळे त्यांना स्वाधारसारखी योजना आणावी लागली; परंतु नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे ही योजनासुद्धा अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वाधारपेक्षा वसतिगृहांची निर्मिती करावी.

- अतुल खोब्रागडे

सामाजिक कार्यकर्ते.