शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

निसर्गाच्या कुशीत उपराजधानी सुरक्षित!

By admin | Updated: July 28, 2014 01:33 IST

उपराजधानीच्या सभोवताल दिसणारी हिरवळ हीच या शहराची संपत्ती आहे़ निसर्गाने चारही बाजूने नागपूरला आपल्या कुशीत सुरक्षित करून घेतले आहे़ झाडांची संख्या जास्त असल्याने अर्थातच येथे

जीवन रामावत - नागपूरउपराजधानीच्या सभोवताल दिसणारी हिरवळ हीच या शहराची संपत्ती आहे़ निसर्गाने चारही बाजूने नागपूरला आपल्या कुशीत सुरक्षित करून घेतले आहे़ झाडांची संख्या जास्त असल्याने अर्थातच येथे प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे़ यावर अलीकडेच एका नामांकित पर्यावरण संस्थेने शिक्कामोर्तबही केले. संबंधित संस्थेने नागपूर पूर्णत: वायू व जल प्रदूषण मुक्त असल्याचे सांगितले आहे. त्यासंबंधी नागपूर महानगरपालिकेला एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. जागतिक निसर्ग पर्यावरण दिनानिमित्त नागपूरकरांसाठी हा सुखद दिलासा असला, तरी उपराजधानीला भविष्यातही असेच प्रदूषणमुक्त ठेवायचे असेल, तर नवीन काही संकल्प या निमित्ताने करावा लागणार आहे़कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) दुसऱ्या एका सर्वेक्षण रिपोर्टनुसार उपराजधानीला घातक धुलिकणांनी वेढले आहे. यातून शहराच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने गत एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ दरम्यान राज्यातील विविध मोठ्या शहरांसह नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्ग, हिंगणा एमआयडीसी, सदर व सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रदूषणाचे अध्ययन केले आहे. यात चारही भागात श्वासाव्दारे थेट शरीरात जाणाऱ्या (रेस्पायरेबल सस्पेन्डेट पार्टिक्युलेट मॅटर) धुलिकणाचे फार मोठे प्रमाण आढळून आले आहे. एमपीसीबीच्या रिपोर्टनुसार या धुलिकणांचे ६० ( मायक्रोग्रॅम- क्युबिक मीटर) प्रमाण सामान्य मानल्या जाते. परंतु उपराजधानीतील चारही भागात या धुलिकणांचे प्रमाण ५५ ते १४९ मायक्रोग्रॅम - क्युबिक मीटरपर्यत आढळून आले आहे. जे आरोग्यासाठी हानीकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘स्मॉग’ ही नागपुरातील दुसरी सर्वांत मोठी समस्या बनली आहे. शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची झपाट्याने संख्या वाढत आहे. या सर्व वाहनांतून निघणारा विषारी धूर व वातावरणातील ‘फॉग’ त्यातून ‘स्मॉग’ तयार होत आहे. यामुळे वातावरणात कार्बन मोनोक्साईडचा थर निर्माण होत आहे. याशिवाय शहरात सुमारे ११ मोठे तलाव आहेत. मात्र ते सर्व प्रदूषणाचा सामना करीत आहे. कोणत्याही तलावातील पाणी पिण्यासाठी सोडाच, आंघोळीयोग्य राहिलेले नाही. या सर्व तलावांत खुलेआम गडरचे पाणी सोडले जात आहे. त्या पाण्यात नायट्रोजन फॉस्फरस असल्याने तलावातील पाण्यात शेवाळ व जलकुंभीसारख्या वनस्पती वाढत आहे. त्याचवेळी शहराची सुंदरता वाढविण्याच्या मोहात क्रॉंक्रिट रस्त्यांचा जंगल तयार केला जात आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न जिरता, बाहेर वाहून जात आहे. परिणामी शहरातील भूजल पातळी झपाट्याने खोल जात आहे. ही सुद्धा उपराजधानीसाठी धोक्याची घंटा आहे.