शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

चिठ्ठीशिवाय औषधी विकणे भोवले; विकतात अनेकजण, सापडले केवळ ४४ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST

नागपूर : डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी विकू नये, असा नियम आहे. चिठ्ठीविना औषधी विकणाऱ्यांवर औषध प्रशासन विभागातर्फे कठोर कारवाई करून ...

नागपूर : डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी विकू नये, असा नियम आहे. चिठ्ठीविना औषधी विकणाऱ्यांवर औषध प्रशासन विभागातर्फे कठोर कारवाई करून परवाना निलंबित वा रद्द करण्यात येतो. पण कोरोना काळात फार्मसी चालकांकडे औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. तर नागरिकांनीही कोरोना चाचणीच्या भितीने आजार सांगून फार्मसीमधून औषधी विकत घेतली. चिठ्ठीविना औषधी विकणाऱ्या दुकानांवर औषध प्रशासन विभागाने कारवाई करून अनेकांचे परवाने निलंबित तर काहींचे रद्द केले आहेत.

जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा जास्त फार्मासिस्टचे परवाने आहेत. अनेक दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसतात तर काही ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देऊ नये, असा नियम आहे, पण बहुतांश फार्मसी चालकांकडून याचे उल्लंघन होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाईला वेग येत नाही. आकस्मिक तपासणी आणि तक्रारीनंतर होणाऱ्या कठोर कारवायांमुळे फार्मासिस्टचे धाबे दणाणले आहे.

अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी

मेडिकल चौकात औषधांची अनेक दुकाने आहेत. त्यातील बहुतांश रात्रभर सुरू असतात. या दुकानांमध्ये दिवसा वा रात्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळते. येथील एका फार्मासिस्टने पॅरासिटमॉलच्या गोळा चिठ्ठीविनाच दिल्या. या परिसरातील कोणत्याही दुकानात आवश्यक औषधी खरेदीसाठी गेले तर कुणीही चिठ्ठीविना औषधी विकत असल्याचे दिसून आले.

पंचशील चौक, धंतोली, रामदासपेठ परिसरातील औषधांच्या दुकानांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी मिळत असल्याचे दिसून आले. फार्मासिस्टने दिलेल्या औषधांनी रूग्ण बरा होत असेल तर त्यात वाईट काय, असा सवालही एका फार्मासिस्टने केला. या परिसरातील बहुतांश फार्मासिस्ट औषधी विकतात. कारवाई कुणावर होते, हा गंभीर प्रश्न आहे.

कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?

कोरोना काळात सर्वत्र भितीचे वातावरण होते. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे अनेकांना दिसून येत होती. उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यास कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळे अनेकांनी ओळखीच्या फार्मसीत जाऊन औषधी घेतल्याची उदाहरणे पाहायला मिळाली. अनेकांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी घेतली. औषधांनी सर्दी, खोकला व अंगदुखी बरी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अशा झाल्या कारवाया :

४४ फार्मसीवर कारवाई

१ जानेवारी ते १८ ऑगस्ट २०२१ या काळात औषध प्रशासन विभागाने एकूण ४४ फार्मसीवर कारवाई करताना ३८ जणांचे परवाने निलंबित केले तर ६ जणांचे रद्द केले. याशिवाय ९ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले.

अनेक कारणांनी होतो परवाना रद्द

आकस्मिक तपासणी वा तक्रारीनंतर फार्मसीची पाहणी केली जाते. अनेकदा प्रतिबंधित औषधांची विक्री, डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विक्री वा दुकानात फार्मसिस्ट आढळून येत नाही. या शिवाय अन्य कारणांनीही फार्मसीचे निलंबन वा परवाना रद्द करण्यात येतो. अशा प्रकरणांमध्ये ९ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पुष्पहास बल्लाळ, सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग.