शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढल्याने, एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक गेला होता. याला सर्वोच्च ...

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढल्याने, एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक गेला होता. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी ओबीसींचे आरक्षण रद्द करीत, या जागांवर फेरनिवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यावर निवडणूक आयोगानेही ओबीसींचे आरक्षण सरसकट रद्द करीत, सर्वच जागांवर फेरनिवडणुकांचे आदेश काढले. यात नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि पालघर या जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांच्या समावेश होता. राज्य सरकारने या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल केली होती, तसेच राज्यातील १९ जिल्हा परिषद सदस्यांनीही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित निकाल देताना, या सर्वच याचिका फेटाळून लावल्या, तसेच ४ मार्च रोजीच्या आदेशावर स्थगनादेश देण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

- आरक्षणाची मर्यादा ५० टक्के असल्याने एससी, एसटीचे आरक्षण वगळून, उरलेले २७ टक्के ओबीसींना मिळाले. लोकसंख्येचा विचार केल्यास ५२ टक्के ओबीसी आहेत. ओबीसीचे आरक्षण निश्चित करताना, लोकसंख्येचा मुद्दा विचारात घेतला गेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागणारे राज्य सरकार किंवा राखीव जागा ठरविणारे राज्य निवडणूक आयोग दोहोंनीही बाजू ठरवलीच नसल्याने, या ठिकाणी असफल ठरले आहे. ओबीसीच्या पथ्यावर राज्य सरकारचे हे सर्व अपयश येऊन पडले.

नितीन चौधरी

मुख्य संयोजक, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा.