शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुलाच्या समर्थनार्थ ‘मा.गो.’ आले धावून

By admin | Updated: January 22, 2017 02:21 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे.

गरजूंना आरक्षण मिळते का तपासा ? : देशपातळीवर समिती नेमण्याची मागणी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे. वैद्य यांचे वडील व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी त्यांची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरली आहे. मागासवर्गीय जाती व जमातींमधील अनेक जण अद्यापही गरीब असल्याने त्यांना आरक्षण असायला हवेच. मात्र ‘ओबीसी’ समाजातील खऱ्या गरजूंपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचत आहेत की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशपातळीवर समिती नेमण्याची आवश्यकता असल्याचे मत मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले. आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आवश्यकता असून त्याजागी अशी व्यवस्था लागू करण्यात यावी ज्यात सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल, असे वक्तव्य डॉ.मनमोहन वैद्य यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ‘यू टर्न’ घेत संघ आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून देशभरातील विविध राजकीय पक्षांकडून टीका सुरू झाली तर भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. संघाने व्यक्त केली नाराजी दरम्यान, मा.गो. वैद्य यांच्या मागणीसंदर्भात संघाने मात्र ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. संबंधित वक्तव्य हे मा.गो. वैद्य यांचे वैयक्तिक मत आहे. संघ त्या मताशी सहमत नाही. आरक्षण सुरूच राहायला हवे व त्याची अंमलबजावणी पूर्णपणे व्हायलाच हवी, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी स्पष्ट केले. संघ आरक्षणविरोधी असल्याचे चित्र उभे केले जात आहे. याची आम्ही निंदा करतो, असेदेखील ते म्हणाले.