शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

मुलाच्या समर्थनार्थ ‘मा.गो.’ आले धावून

By admin | Updated: January 22, 2017 02:21 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे.

गरजूंना आरक्षण मिळते का तपासा ? : देशपातळीवर समिती नेमण्याची मागणी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे. वैद्य यांचे वडील व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी त्यांची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरली आहे. मागासवर्गीय जाती व जमातींमधील अनेक जण अद्यापही गरीब असल्याने त्यांना आरक्षण असायला हवेच. मात्र ‘ओबीसी’ समाजातील खऱ्या गरजूंपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचत आहेत की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशपातळीवर समिती नेमण्याची आवश्यकता असल्याचे मत मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले. आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आवश्यकता असून त्याजागी अशी व्यवस्था लागू करण्यात यावी ज्यात सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल, असे वक्तव्य डॉ.मनमोहन वैद्य यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ‘यू टर्न’ घेत संघ आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून देशभरातील विविध राजकीय पक्षांकडून टीका सुरू झाली तर भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. संघाने व्यक्त केली नाराजी दरम्यान, मा.गो. वैद्य यांच्या मागणीसंदर्भात संघाने मात्र ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. संबंधित वक्तव्य हे मा.गो. वैद्य यांचे वैयक्तिक मत आहे. संघ त्या मताशी सहमत नाही. आरक्षण सुरूच राहायला हवे व त्याची अंमलबजावणी पूर्णपणे व्हायलाच हवी, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी स्पष्ट केले. संघ आरक्षणविरोधी असल्याचे चित्र उभे केले जात आहे. याची आम्ही निंदा करतो, असेदेखील ते म्हणाले.