शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारहाण केल्याच्या पश्चात्तापातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

यवतमाळचा मूळ निवासी असलेला चव्हाण हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने राहत होता. घरगुती कारणावरून त्याचा बुधवारी सकाळी ११.३० वाजता ...

यवतमाळचा मूळ निवासी असलेला चव्हाण हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने राहत होता. घरगुती कारणावरून त्याचा बुधवारी सकाळी ११.३० वाजता पत्नीसोबत वाद झाला. रागाच्या भरात चव्हाणने पत्नीला बेदम मारहाण केली. ती जखमी झाल्यानंतर तिच्या भावजयीने तिला डॉक्टरकडे नेले. इकडे चव्हाण कमालीचा अस्वस्थ झाला. पत्नीला एवढे बेदम मारहाण करण्यासारखा तिचा दोष नव्हता, या भावनेने त्याला अपराधीपणाची जाणीव झाली आणि त्या अवस्थेत त्याने पत्नीच्या साडीने गळफास लावून घेतला. पत्नीने घरी परल्यानंतर पतीला मृतावस्थेत बघून एकच हंबरडा फोडला. भूपेंद्र लालसिंग चव्हाणच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

-----------------------

महिलेसह तिघांची आत्महत्या

नागपूर : उपराजधानीतील एका महिलेसह तिघांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे, एकाने गळफास लावून घेतला तेथे ओढणीची गाठ सुटल्याने तो खाली पडला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

जरीपटक्यातील इंदिरानगर निवासी आकाश बाबूलाल भालेराव (वय २७) याने बुधवारी सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. मात्र, ओढणीची गाठ सुटली आणि तो खाली पडला. तेथून तो बचावला मात्र खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

३० जूनच्या सायंकाळी नंदनवनमधील वर्षा काळे नामक महिलेने गळफास लावून घेतला. तर, हजारी पहाड गिट्टीखदानमधील एकाने विष खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला. कमलकुमार कन्हैय्यालाल हसिजा असे त्यांचे नाव आहे. हसिजा यांनी २२ जूनला विषाक्त पदार्थ खाल्ला होता. प्रकृती ढासळल्याने त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

----

हॉटेलच्या कर्मचाऱ्याने लावला गळफास

नागपूर : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विश्वजीत मुजुमदार (वय ३७) नामक व्यक्तीने बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. तो सदरमधील आझाद चाैकात सोनी यांच्या घरी भाड्याने राहत होता. मुजुमदार मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी होता. चार-पाच दिवसांपूर्वीच तो रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आला होता आणि त्याला एका हॉटेलमध्ये कामही मिळाले होते. त्याने आत्महत्या का केली, त्याची चाैकशी सदर पोलीस करत आहेत.

----