शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उसाची ओव्हरलोड वाहतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना ...

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना असल्याने येथे जिल्ह्यातून ऊस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रॅक्टरद्वारे येथे ऊस आणला जातो. पण, या ट्रॅक्टरच्या माध्यमातून उसाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने या परिसरात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऊस वाहतूक करताना वाहतूकदारांना उसाच्या वजनाप्रमाणे वाहतुकीचे भाडे मिळते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ऊस वाहतुकीची चढाओढ

उसाच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीत साधारण २० ते २५ टनापर्यंत ऊस भरण्याची क्षमता असते. ट्रॅक्टर मालक कमी वेळात जास्त टन वाहतूक करण्याच्या लालसेने दुप्पट म्हणजे ४० टनाच्या पुढे ऊस भरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ट्रॉली पलटी झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्रॉली पलटल्यानंतर ती पुन्हा भरण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. तो भुर्दंड शेतकऱ्यांना सोसासा लागतो.

अल्पवयीन चालक

ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक करणारे अनेक चालक अल्पवयीन आहेत. त्यात काही मद्यपान करून आणि मोठ्या आवाजात ट्रक्टरमध्ये गाणी लावून वाहने चालवितात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांकडून यावर नियंत्रण हवे, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.

-

बाबदेव येथील साखर कारखाना सुरू असून, या ठिकाणी मौदा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊस विक्रीला आणतात. पण, ट्रॅक्टर चालक एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करतात. ही ओव्हरलोड वाहतूक भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी लक्ष देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी.

- शिवा आकरे, जिल्हा संघटक, मनसे