शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

उसाची ओव्हरलोड वाहतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना ...

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना असल्याने येथे जिल्ह्यातून ऊस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रॅक्टरद्वारे येथे ऊस आणला जातो. पण, या ट्रॅक्टरच्या माध्यमातून उसाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने या परिसरात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऊस वाहतूक करताना वाहतूकदारांना उसाच्या वजनाप्रमाणे वाहतुकीचे भाडे मिळते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ऊस वाहतुकीची चढाओढ

उसाच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीत साधारण २० ते २५ टनापर्यंत ऊस भरण्याची क्षमता असते. ट्रॅक्टर मालक कमी वेळात जास्त टन वाहतूक करण्याच्या लालसेने दुप्पट म्हणजे ४० टनाच्या पुढे ऊस भरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ट्रॉली पलटी झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्रॉली पलटल्यानंतर ती पुन्हा भरण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. तो भुर्दंड शेतकऱ्यांना सोसासा लागतो.

अल्पवयीन चालक

ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक करणारे अनेक चालक अल्पवयीन आहेत. त्यात काही मद्यपान करून आणि मोठ्या आवाजात ट्रक्टरमध्ये गाणी लावून वाहने चालवितात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांकडून यावर नियंत्रण हवे, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.

-

बाबदेव येथील साखर कारखाना सुरू असून, या ठिकाणी मौदा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊस विक्रीला आणतात. पण, ट्रॅक्टर चालक एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करतात. ही ओव्हरलोड वाहतूक भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी लक्ष देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी.

- शिवा आकरे, जिल्हा संघटक, मनसे