शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

उसाची ओव्हरलोड वाहतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना ...

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना असल्याने येथे जिल्ह्यातून ऊस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रॅक्टरद्वारे येथे ऊस आणला जातो. पण, या ट्रॅक्टरच्या माध्यमातून उसाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने या परिसरात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऊस वाहतूक करताना वाहतूकदारांना उसाच्या वजनाप्रमाणे वाहतुकीचे भाडे मिळते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ऊस वाहतुकीची चढाओढ

उसाच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीत साधारण २० ते २५ टनापर्यंत ऊस भरण्याची क्षमता असते. ट्रॅक्टर मालक कमी वेळात जास्त टन वाहतूक करण्याच्या लालसेने दुप्पट म्हणजे ४० टनाच्या पुढे ऊस भरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ट्रॉली पलटी झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्रॉली पलटल्यानंतर ती पुन्हा भरण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. तो भुर्दंड शेतकऱ्यांना सोसासा लागतो.

अल्पवयीन चालक

ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक करणारे अनेक चालक अल्पवयीन आहेत. त्यात काही मद्यपान करून आणि मोठ्या आवाजात ट्रक्टरमध्ये गाणी लावून वाहने चालवितात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांकडून यावर नियंत्रण हवे, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.

-

बाबदेव येथील साखर कारखाना सुरू असून, या ठिकाणी मौदा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊस विक्रीला आणतात. पण, ट्रॅक्टर चालक एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करतात. ही ओव्हरलोड वाहतूक भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी लक्ष देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी.

- शिवा आकरे, जिल्हा संघटक, मनसे