शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचा गोडवा महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST

नागपूर : श्रावण महिना आणि सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले असून ग्राहकांना फटका बसत आहे. ...

नागपूर : श्रावण महिना आणि सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले असून ग्राहकांना फटका बसत आहे. किरकोळ विक्रीत साखरेच्या दरात किलोमागे २ रुपयांची वाढ झाली आहे. नागपुरात सध्या साखर प्रतिकिलो दर्जानुसार ३८ ते ४० रुपयादरम्यान मिळत आहे. साखर महाग झाल्याने ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला आहे.

श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक सणांची मालिकाच सुरू होते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. साखरेच्या किमतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. दर महिन्याला साखरेचा कोटा जाहीर केला जातो. ऑगस्ट महिन्यात कोटा कमी मिळाल्याची माहिती आहे. त्यातच होलसेल व्यापाऱ्यांनीही साखरेचे भाव वाढविल्याने किरकोळमध्ये दर वाढले आहे. साखरेचे व्यापारी पंचमतिया म्हणाले, नागपुरात जाड साखर जास्त प्रमाणात विकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये जाड साखर कमी प्रमाणात तयार होत आहे. परिणामी एम व सुपर एस साखरेच्या भावात क्विंटलमागे १२० रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. किमतीतील तफावत वाढण्याची शक्यता आहे.

सात महिन्यांपासून स्थिर असणारे साखरेचे भाव श्रावण महिन्यात वाढायला लागले आहेत. ठोक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही साखरेची भाववाढ होत असून प्रतिकिलो ३८ ते ४० रुपयादरम्यान भाव झाला आहे.

श्रावणात दररोज ३ हजार क्विंटल साखरेची मागणी

साखरेचे कमिशन एजंट चंदू जैन म्हणाले, नागपुरात साखरेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात दररोज २ हजार क्विंटल साखर विकली जाते. सध्या मागणी वाढली असून जवळपास ३ हजार क्विंटल साखर विकली जात आहे. दिवाळीपर्यंत ही मागणी वाढत जाईल.

का वाढले भाव?

व्यापारी भवरलाल जैन म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि उसाच्या घटत्या प्रमाणामुळे ऑगस्टमध्ये साखरेच्या किंमती प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. हंगामासाठी राज्यात साखर कारखान्यांना उसाच्या घटत्या प्रमाणाशी सामना करावा लागू शकतो. या साऱ्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होऊ शकतो. उत्पादन घटल्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात साखरेच्या किमतीत प्रति किलो २ रुपयांची वाढ होऊन जाड साखरेचे भाव ३८ ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत.

साखरेचे दर (प्रति किलो)

जानेवारी ३६

फेब्रुवारी ३७

मार्च ३६

एप्रिल ३७

मे ३७

जून ३८

जुलै ३८

ऑगस्ट ३९

महिन्याचे बजेट वाढले :

दरवर्षी श्रावण महिन्यात साखरेचे दर वाढत असतात, असा अनुभव आहे. यंदा जास्त वाढ झाली नाही. पण दोन रुपये किलोची वाढ झाल्याने फरक पडतो. साखरेपेक्षा अन्य किराणा वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने महिन्याच्या बजेटवर ताण आला आहे.

सुधा देवतळे, गृहिणी.

श्रावण महिन्यात एरवीपेक्षा साखर जास्तच लागते. यावर्षी सारखेच्या भावात फारशी भाववाढ झाली नाही. केवळ दोन वा तीन रुपयांच्या फरकाने महाग म्हणता येणार नाही. याशिवाय उपवासाच्या वस्तूंचे भाव वाढले आहे. श्रावण महिन्यात महागाई वाढतेच.

मुक्ता प्रांजळे, गृहिणी.