शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

उपराजधानीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 26, 2015 02:14 IST

पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे.

नागपूर : पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच दुरुस्तीसाठी ७२ तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शहरातील पश्चिम व दक्षिण भागाला तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. मोजकेच पाणी मिळणार असल्याने लोकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा वाकी परिसरातील गोसेवाडी येथे फुटला आहे. कालव्यातून ५७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या कालव्याव्दारे नागपूर शहरासोबतच खापरखेडा व कोराडी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास कालव्याला छिद्र पडले. शेतकऱ्यांनी याची माहिती पेंच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. दुपारी १२ वाजता पेंच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु २३ कि.मी. अंतर पार करण्याला बराच कालावधी लागला. त्याुमळे दुपारी ३ च्या सुमारास कालव्याला मोठे भगदाड पडले. यात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी तामसवाडी कालव्यात पाणी सोडण्यात आले. पेंच कालव्याची अवस्था दयनीय आहे. पेंच टप्पा -४ च काम मागील सहा वर्षापासून सुरु आहे. ३१ मार्च २०१२ पर्यत काम पूर्ण होऊ न पाणी पुरवठा सुरु होणे अपेक्षित होते. ते निर्धारित कालावधीत न झाल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुुरुस्तीला वेळ मिळाला नसल्याची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)तीन दिवस बसणार फटका कालवा फुटल्याने पेंच प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला दुपारनंतर कालव्यात महादुला पंपिंग स्टेशनमधून गोरेवाडा तलावात पंप करण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. या तलावाची सध्याची पातळी ३१५ मीटर इतकी आहे. पुढील ३ दिवसात ती ११४ .३ इतकी घटण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम पेंच प्रकल्पातील शुद्धीकरण केंद्रावर होणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १ मार्चला सकाळपर्यत पश्चिम व दक्षिण नागपुरातील वस्त्यांना मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली आहे.शेती व पिकाचे नुकसानइतक्या मोठ्या प्रमाणात कालवा फुटण्याची ही पहिलीच घटना आहे. पाण्याच्या प्रवाहात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे आजूबाजूच्या शेतात शिरल्याने शेतीसोबतच पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याजवळील शेती खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.