शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उपराजधानीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 26, 2015 02:14 IST

पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे.

नागपूर : पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच दुरुस्तीसाठी ७२ तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शहरातील पश्चिम व दक्षिण भागाला तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. मोजकेच पाणी मिळणार असल्याने लोकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा वाकी परिसरातील गोसेवाडी येथे फुटला आहे. कालव्यातून ५७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या कालव्याव्दारे नागपूर शहरासोबतच खापरखेडा व कोराडी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास कालव्याला छिद्र पडले. शेतकऱ्यांनी याची माहिती पेंच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. दुपारी १२ वाजता पेंच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु २३ कि.मी. अंतर पार करण्याला बराच कालावधी लागला. त्याुमळे दुपारी ३ च्या सुमारास कालव्याला मोठे भगदाड पडले. यात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी तामसवाडी कालव्यात पाणी सोडण्यात आले. पेंच कालव्याची अवस्था दयनीय आहे. पेंच टप्पा -४ च काम मागील सहा वर्षापासून सुरु आहे. ३१ मार्च २०१२ पर्यत काम पूर्ण होऊ न पाणी पुरवठा सुरु होणे अपेक्षित होते. ते निर्धारित कालावधीत न झाल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुुरुस्तीला वेळ मिळाला नसल्याची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)तीन दिवस बसणार फटका कालवा फुटल्याने पेंच प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला दुपारनंतर कालव्यात महादुला पंपिंग स्टेशनमधून गोरेवाडा तलावात पंप करण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. या तलावाची सध्याची पातळी ३१५ मीटर इतकी आहे. पुढील ३ दिवसात ती ११४ .३ इतकी घटण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम पेंच प्रकल्पातील शुद्धीकरण केंद्रावर होणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १ मार्चला सकाळपर्यत पश्चिम व दक्षिण नागपुरातील वस्त्यांना मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली आहे.शेती व पिकाचे नुकसानइतक्या मोठ्या प्रमाणात कालवा फुटण्याची ही पहिलीच घटना आहे. पाण्याच्या प्रवाहात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे आजूबाजूच्या शेतात शिरल्याने शेतीसोबतच पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याजवळील शेती खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.