शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

उपराजधानीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 26, 2015 02:14 IST

पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे.

नागपूर : पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच दुरुस्तीसाठी ७२ तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शहरातील पश्चिम व दक्षिण भागाला तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. मोजकेच पाणी मिळणार असल्याने लोकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा वाकी परिसरातील गोसेवाडी येथे फुटला आहे. कालव्यातून ५७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या कालव्याव्दारे नागपूर शहरासोबतच खापरखेडा व कोराडी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास कालव्याला छिद्र पडले. शेतकऱ्यांनी याची माहिती पेंच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. दुपारी १२ वाजता पेंच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु २३ कि.मी. अंतर पार करण्याला बराच कालावधी लागला. त्याुमळे दुपारी ३ च्या सुमारास कालव्याला मोठे भगदाड पडले. यात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी तामसवाडी कालव्यात पाणी सोडण्यात आले. पेंच कालव्याची अवस्था दयनीय आहे. पेंच टप्पा -४ च काम मागील सहा वर्षापासून सुरु आहे. ३१ मार्च २०१२ पर्यत काम पूर्ण होऊ न पाणी पुरवठा सुरु होणे अपेक्षित होते. ते निर्धारित कालावधीत न झाल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुुरुस्तीला वेळ मिळाला नसल्याची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)तीन दिवस बसणार फटका कालवा फुटल्याने पेंच प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला दुपारनंतर कालव्यात महादुला पंपिंग स्टेशनमधून गोरेवाडा तलावात पंप करण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. या तलावाची सध्याची पातळी ३१५ मीटर इतकी आहे. पुढील ३ दिवसात ती ११४ .३ इतकी घटण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम पेंच प्रकल्पातील शुद्धीकरण केंद्रावर होणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १ मार्चला सकाळपर्यत पश्चिम व दक्षिण नागपुरातील वस्त्यांना मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली आहे.शेती व पिकाचे नुकसानइतक्या मोठ्या प्रमाणात कालवा फुटण्याची ही पहिलीच घटना आहे. पाण्याच्या प्रवाहात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे आजूबाजूच्या शेतात शिरल्याने शेतीसोबतच पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याजवळील शेती खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.