शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारतकरिता पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST

नागपूर : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले. ...

नागपूर : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले. देशाच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली, असेही त्यांनी सांगितले.

विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी(व्हीएनआयटी)चा १८ वा दीक्षांत समारंभ सोमवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडला. त्यावेळी पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, एल ॲण्ड टी कंपनीचे आजीवन संचालक जे. डी. पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान, पोखरियाल यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच व्हीएनआयटीने कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली.

विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या उत्कर्षाकरिता पुढे येण्याची हीच खरी वेळ आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पालकांचा त्याग विसरू नये. संस्थेतून मिळालेल्या शिक्षणाचा त्यांनी देशाकरिता उपयोग करावा, असे धोत्रे म्हणाले. व्हीएनआयटी संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी प्रास्ताविक केले. व्हीएनआयटी वेगात प्रगती करीत आहे. त्यात विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले. रजिस्ट्रार डॉ. एस. आर. साठे यांनी आभार मानले.

-----------

११३४ पदव्या वितरित

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ११३४ पदव्या वितरित करण्यात आल्या. त्यात ६१ पीएच.डी., २६८ मास्टर ऑफ टेक्नालॉजी, ९४ मास्टर ऑफ सायन्स, ६४८ बॅचलर ऑफ टेक्नालॉजी व ६३ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्यांचा समावेश होता. याशिवाय ४५ पदके प्रदान करण्यात आली.

---------

हे विद्यार्थी सन्मानित

बी.टेक. विद्यार्थी अब्दुल सत्तार मोहम्मद अश्रफ मपारा व चेतना श्रीवास्तव यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.