शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही काळापासून ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांची या क्षेत्राकडे नजर आहे. सायबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील काही काळापासून ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांची या क्षेत्राकडे नजर आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: विद्यार्थी व तरुण हे सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे त्यांच्या या संदर्भात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत विविध सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे ‘उच्चशिक्षण संस्थांमध्ये सायबर जागरूकता आणि सायबर शिस्त’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपमहासंचालक संदीप पाटील, कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण बघता, शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन तयार केलेले आहेत. मात्र, तरुणांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करणे आज काळाची गरज असल्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले. ऑनलाइन वर्गांमुळे लहान मुलेही इंटरनेट वापरत आहेत. त्यांना लहानपणापासून सायबर गुन्ह्यांची माहिती दिली पाहिजे, असे प्रतिपादन विनिता साहू यांनी केले. आज जगाच्या कोपऱ्यात कुठेही बसून ऑनलाइन चोरी होऊ शकते. त्यामुळे सायबर जागरूकता ही काळाची गरज असल्याचे मत डॉ.सुभाष चौधरी यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांवर वावरताना तरुणाईने सावध असले पाहिजे. अज्ञानातून कुणाकडूनही गुन्हा होऊ शकतो, याची जाण ठेवायला हवी, असे अशोक बागुल म्हणाले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी केले.