शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही काळापासून ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांची या क्षेत्राकडे नजर आहे. सायबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील काही काळापासून ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांची या क्षेत्राकडे नजर आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: विद्यार्थी व तरुण हे सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे त्यांच्या या संदर्भात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत विविध सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे ‘उच्चशिक्षण संस्थांमध्ये सायबर जागरूकता आणि सायबर शिस्त’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपमहासंचालक संदीप पाटील, कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण बघता, शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन तयार केलेले आहेत. मात्र, तरुणांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करणे आज काळाची गरज असल्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले. ऑनलाइन वर्गांमुळे लहान मुलेही इंटरनेट वापरत आहेत. त्यांना लहानपणापासून सायबर गुन्ह्यांची माहिती दिली पाहिजे, असे प्रतिपादन विनिता साहू यांनी केले. आज जगाच्या कोपऱ्यात कुठेही बसून ऑनलाइन चोरी होऊ शकते. त्यामुळे सायबर जागरूकता ही काळाची गरज असल्याचे मत डॉ.सुभाष चौधरी यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांवर वावरताना तरुणाईने सावध असले पाहिजे. अज्ञानातून कुणाकडूनही गुन्हा होऊ शकतो, याची जाण ठेवायला हवी, असे अशोक बागुल म्हणाले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी केले.