शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला जिल्ह्याचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूरतर्फे ‘ग्रेट भेट’ कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूरतर्फे ‘ग्रेट भेट’ कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुरतत्व व इतिहास संशाेधक डाॅ. मनाेहर नरांजे यांची ‘झूम वेबिनार’द्वारे मुलाखत घेत नागपूर जिल्ह्याचा इतिहास जाणून घेतला.

यात डाॅ. मनाेहर नरांजे यांनी सांगितले की, इतिहास हा भूगोलावर घडत असतो. काल्पनिक इतिहासाला महत्त्व न देता पुरातन वास्तू व पुरावे या आधारावर खरा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधु’ हा नागपूर जिल्ह्यात लिहिला गेला. ऐतिहासिक ‘नगरधन’सारखे समृद्ध व व्यापारी केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे. राजा बख्त बुलंदशहा यांनी ३०० वर्षांपूर्वी नागपूर शहर बसविलेले आहे. नागपूर जिल्ह्यात रामटेक, पारशिवनी, काटोल, नरखेड या भागात भरपूर पुरातन वास्तू आहे. खोदकामात बऱ्याच वस्तू सापडलेल्या आहेत. या वस्तूचे जतन करण्यासाठी ‘स्थानिक संग्रहालय’ निर्मिती शासन स्तरावर होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्या पूर्वजांचा इतिहास भावी पिढीला कळेल, असेही ते म्हणाले.

वेधचे समन्वय धनंजय पकडे यांनी प्रास्ताविकातून या उपक्रम व कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. संचालन ग्रेट भेट उपक्रमाचे समन्वयक राजेंद्र टेकाडे यांनी केले, तर मारोती मुरके यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी वेधचे सचिव खुशाल कापसे, कमलेश सोनकुसळे, ओंकार पाटील, वीरेंद्र वाघमारे, एकनाथ खजुरिया, किशोर रोगे, भाऊराव जिभकाटे, शुभांगी कळंबे आदींनी सहकार्य केले.

इतिहासात विदर्भावर अन्याय

बालभारती, पुणेद्वारा पाठ्यपुस्तके तयार केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये विदर्भावर अन्याय केला जातो. पाठ्यपुस्तके मंडळाच्या सदस्यपदी पश्चिम महाराष्ट्रातील व्यक्तींचा भरणा अधिक असल्यामुळे विदर्भाचा इतिहास फक्त चवीपुरता असतो. विदर्भाला पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात लाभली असतानाही पाठ्यपुस्तकांमध्ये विदर्भ दुर्लक्षित आहे. यासाठी वैदर्भीय लेखकांनी स्थानिक विषयांवर लेखन करावे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र टेकाडे यांनी व्यक्त केली.