शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिली रात्री परीक्षा

By admin | Updated: February 28, 2017 02:08 IST

रामटेक तालुक्यातील वाहिटोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) एकूण २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेतात.

रामटेकच्या ‘आयटीआय’मधील प्रकार : प्राचार्याच्या मनमानीमुळे विद्यार्थी-शिक्षक त्रस्तमनसर : रामटेक तालुक्यातील वाहिटोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) एकूण २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेतात. मात्र, या विद्यार्थी तसेच शिक्षक प्राचार्य बन्सोड यांच्या मनमानी कारभाराला चांगलेच त्रासले आहेत. याचा कळस म्हणजे, प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना रात्रीच्यावेळी परीक्षा द्यायला भाग पाडले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. रामटेक नजीकच्या वाहिटोला येथे आयटीआयच्या दोन प्रशस्त इमारती आहेत. यातील एका इमारतीमध्ये वर्ग खोल्या, शिक्षकांची खोली, प्राचार्यांचे कार्यालय व इतर कार्यालये असून, दुसऱ्या इमारतीमध्ये सर्व विभागांचे प्रात्यक्षिक कक्ष आहेत. या संस्थेत विद्यार्थ्यांना वीजतंत्री, तारतंत्री, डिझल मेकॅनिक, वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, गवंडी यासह विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. या संस्थेत कन्हान, पारशिवनी, देवलापार, करवाही, अरोली, कोदामेंढी यासह अन्य गावांमधील एकूण २५० विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राचार्य बन्सोड मनमानी करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ते दमदाटी करीत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तक्रारी केल्यास वाईट परिणाम होणार असल्याच्या धमक्याही देत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्राचार्य बन्सोड यांनी २१ जानेवारी रोजी वर्कशॉपच्या दारात उभे राहून अनेक विद्यार्थ्यांना घरी पाठविले. ‘एनएसएस’च्या कार्यक्रमात त्यांनी गट निदेशक शिक्षिका व इतर शिक्षकांना अपमानित केले. एवढेच नव्हे तर तक्रार केल्यास परिणाम भोगण्याची धमकीही दिली. त्यांचे असले प्रकार वाढीस लागल्याने विद्यार्थ्यांनी फेब्रुवारीत झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना अपुरे पेपर देणे, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश करणे, कुणाला इंग्रजी तर कुणाला न समजणाऱ्या हिंदी भाषेतील प्रश्नपत्रिका देणे, ऐनवेळी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती वितरित करणे, विद्यार्थ्यांना रात्रीच्यावेळी परीक्षा द्यायला भाग पाडणे अशा अनुभवाला सामोरे जावे लागले. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. परंतु, कुणीही गांभीर्याने घेतले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांनी आ. डी. एम. रेड्डी, तहसीलदार रवीेंद्र माने, सहसंचालक (व्यवसाय शिक्षण कार्यालय नागपूर) रणजित देशमुख तसेच कौशल्य विकास आणि उद्योजगता विभागाकडे लेखी तक्रारी दिल्या. मात्र, कुणीही तक्रारीची दखल घेण्याचे औदार्य दाखविले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (वार्ताहर)विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढाप्रशिक्षण सुरू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत ‘ईडी’ व ‘ईएस’ या विषयांचे शिक्षक नव्हते. दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली नाही. शौचालयांची साफसाफाई केली जात नाही. कार्यशाळेत उघड्या विजेच्या तारांमुळे जीवित हानी होण्याची शक्यता बळावली आहे. येथील वीजपुरवठा नेहमीच कमी-अधिक होतो. प्रात्यक्षिक करण्यासाठी योग्य उपकरण नाही. प्राचार्य नेहमी गैरहजर असतात. ग्रंथालय अद्यापही सुरू करण्यात आले नाही. भांडार विभाग बंद असल्याने आवश्यक उपकरण मिळत नाही. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यर्थ्यांवर दबाव टाकला जातो. अशा अनेक समस्यांचा पाढा विद्यार्थ्यांनी वाचला.