शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

संघर्षाची साथ कधीच सोडली नाही

By admin | Updated: April 18, 2017 01:48 IST

मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती.

उमेश चौबे यांचे प्रतिपादन : शुभेच्छांच्या वर्षावात सत्कार नागपूर : मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती. त्यामुळेच इतरत्र सरकारी नोकरी लागत असतानाही मी त्या नाकारल्या. आयुष्यभर सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. त्यातच नोकरी सोडण्याची वेळ आली. मात्र अनंत अडचणींवर मात करून मी संघषार्ची साथ कधीच सोडली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी केले. वाढदिवसानिमित्त सत्कारादरम्यान मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.नागपूरचे सजग प्रहरी आणि वरिष्ठ पत्रकार अशी ओळख असणारे उमेशबाबू चौबे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे बख्त बुलंद शाह स्मारक समिती आणि विविध संघटनांतर्फे जन्मदिवस आणि कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शुभचिंतकांनी केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाला उत्तर देताना ते बोलत होते. डॉक्टरांचा सल्ला डावलूनही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला, हे विशेष. पंडित उमेश शर्मा, अ‍ॅड. मधुकर किंमतकर, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, बबनराव तायवाडे, आयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मिश्रा, दीनानाथ पडोळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित होते. उमेशबाबू यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आलेला एक अनुभव सांगतानाच माझ्या जीवनात सिक्रेट असे काहीच नाही. ते खुली किताब आहे. प्रत्येकाने विश्वासाने दिलेला ठेवा आयुष्यात मी आजवर जपला आहे, असे प्रतिपादन शुभचिंतकांच्या शुभेच्छांना उत्तर देताना वरिष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे यांनी व्यक्त केले. मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचामुळे आजही अनेक भगिनींचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.स्मारक समितीचे संयोजक राजे वीरेंद्र शाह म्हणाले, उमेशबाबूंनी अन्याय, अत्याचाराविरोधात आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या कार्याला तोड नाही. शहराचा दडपण्यात आलेला खरा इतिहास जनतेपुढे आणण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. आमदार, खासदारांना जे शक्य झाले नाही ते बाबूजींनी करून दाखविल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी आदिती धात्रक या मुलीने तयार केलेला केक कापण्यात आला. गिनीज बुकात सर्वात लहान उंचीची महिला म्हणून मान मिळविलेल्या ज्योती आमगे हिने बाबूजींना केक भरवला. पंडित उमेश शर्मा यांनी उपस्थितांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन उमेशबाबूंचा सत्कार केला. तत्पूर्वी त्यांच्या वजनाची लाडूतुलाही करण्यात आली. विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिक कार्यकर्त्यांनी उमेशबाबूंना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.(प्रतिनिधी)बाबूजींना मिळावी पद्मश्री तत्पूर्वी कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्यांनी बाबूजींचे कार्य मोठे आहे. त्यांच्या लढाऊपणामुळे आजवर अनेकांना न्याय मिळाला. मात्र शासकीय पातळीवर आजही ते दुर्लक्षित आहेत. त्यांच्या कार्याची दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. बाबूजींना पद्मश्री पुरस्कार मिळावा असे उपस्थितांना वाटते का, असा प्रश्न अचानक विचारला. उपस्थितांपैकी प्रत्येकाने हात वर करून होकारार्थी उत्तर दिले.