शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

संघर्षाची साथ कधीच सोडली नाही

By admin | Updated: April 18, 2017 01:48 IST

मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती.

उमेश चौबे यांचे प्रतिपादन : शुभेच्छांच्या वर्षावात सत्कार नागपूर : मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती. त्यामुळेच इतरत्र सरकारी नोकरी लागत असतानाही मी त्या नाकारल्या. आयुष्यभर सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. त्यातच नोकरी सोडण्याची वेळ आली. मात्र अनंत अडचणींवर मात करून मी संघषार्ची साथ कधीच सोडली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी केले. वाढदिवसानिमित्त सत्कारादरम्यान मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.नागपूरचे सजग प्रहरी आणि वरिष्ठ पत्रकार अशी ओळख असणारे उमेशबाबू चौबे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे बख्त बुलंद शाह स्मारक समिती आणि विविध संघटनांतर्फे जन्मदिवस आणि कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शुभचिंतकांनी केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाला उत्तर देताना ते बोलत होते. डॉक्टरांचा सल्ला डावलूनही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला, हे विशेष. पंडित उमेश शर्मा, अ‍ॅड. मधुकर किंमतकर, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, बबनराव तायवाडे, आयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मिश्रा, दीनानाथ पडोळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित होते. उमेशबाबू यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आलेला एक अनुभव सांगतानाच माझ्या जीवनात सिक्रेट असे काहीच नाही. ते खुली किताब आहे. प्रत्येकाने विश्वासाने दिलेला ठेवा आयुष्यात मी आजवर जपला आहे, असे प्रतिपादन शुभचिंतकांच्या शुभेच्छांना उत्तर देताना वरिष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे यांनी व्यक्त केले. मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचामुळे आजही अनेक भगिनींचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.स्मारक समितीचे संयोजक राजे वीरेंद्र शाह म्हणाले, उमेशबाबूंनी अन्याय, अत्याचाराविरोधात आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या कार्याला तोड नाही. शहराचा दडपण्यात आलेला खरा इतिहास जनतेपुढे आणण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. आमदार, खासदारांना जे शक्य झाले नाही ते बाबूजींनी करून दाखविल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी आदिती धात्रक या मुलीने तयार केलेला केक कापण्यात आला. गिनीज बुकात सर्वात लहान उंचीची महिला म्हणून मान मिळविलेल्या ज्योती आमगे हिने बाबूजींना केक भरवला. पंडित उमेश शर्मा यांनी उपस्थितांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन उमेशबाबूंचा सत्कार केला. तत्पूर्वी त्यांच्या वजनाची लाडूतुलाही करण्यात आली. विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिक कार्यकर्त्यांनी उमेशबाबूंना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.(प्रतिनिधी)बाबूजींना मिळावी पद्मश्री तत्पूर्वी कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्यांनी बाबूजींचे कार्य मोठे आहे. त्यांच्या लढाऊपणामुळे आजवर अनेकांना न्याय मिळाला. मात्र शासकीय पातळीवर आजही ते दुर्लक्षित आहेत. त्यांच्या कार्याची दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. बाबूजींना पद्मश्री पुरस्कार मिळावा असे उपस्थितांना वाटते का, असा प्रश्न अचानक विचारला. उपस्थितांपैकी प्रत्येकाने हात वर करून होकारार्थी उत्तर दिले.