शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

‘महाज्योती’च्या मूळ उद्देशालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:07 IST

नागपूर : भटक्या विमुक्त जाती-जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण ...

नागपूर : भटक्या विमुक्त जाती-जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’ची स्थापना केली. इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रदीप डांगे यांचे नियुक्ती करण्यात आली. तीन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती केली गेली. बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आली. संस्थेचे मुख्यालय नागपुरात हलविण्यात आले. या संस्थेला वर्ष होत आहे; पण उद्देशाकडे वाटचाल मंदावली आहे. पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नाही, संचालकांच्या बैठका नाहीत, कार्यालय नाही; यामुळे ओबीसी व व्हीजेएनटी समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे.

ओबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गांतील विद्यार्थी व युवकांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने ‘बार्टी’ आणि ‘सारथी’च्या धर्तीवर महाज्योतीची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यानंतर महाज्योतीतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यातही स्पर्धेचा निकाल तीन महिने उशिरा लागला. समाज संघटना व विद्यार्थ्यांचा सर्वांत मोठा रोष हा व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध आहे. प्रदीप डांगे जे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. गेल्या १० महिन्यांत फक्त शनिवार आणि रविवारीच ते नागपूरला असतात व गेल्या तीन महिन्यांपासून ते एकदाही कार्यालयात गेले नाहीत, असाही त्यांच्यावर आरोप होत आहे. नागपुरात महाज्योतीचे मुख्यालय आहे; परंतु मुख्यालयाला कार्यालयच नाही. या संस्थेवर तीन तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली; पण संचालकांनीच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक महिन्याला संचालक मंडळाची बैठक होणे आवश्यक आहे; परंतु व्यवस्थापकीय संचालकाकडे गोंदियाचा भार व अध्यक्षाकडे राज्याचा भार असल्याने अवघ्या १० महिन्यांत २ बैठकाच होऊ शकल्या.

महाज्योतीचा दैनंदिन व महत्त्वाचा कारभार शासन प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना न देता, कंत्राटी पदावर नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून केला गेला. त्यामुळे योजनांची अंमलबजावणीच झाली नाही. परिणामी निधी मिळूनही खर्च होऊ शकला नाही. भटक्या जातीजमातीकडे तर महाज्योतीचे दुर्लक्षच असल्याची ओरड होत आहे. उद्देशाला हरताळ फासला जात असेल तर ‘महाज्योती’ विझल्याशिवाय राहणार नाही, असे समाजाच्या संघटनांचे म्हणणे आहे.

यंत्रणा बदलल्याशिवाय पर्याय नाही

व्यवस्थापकीय संचालकांचे दुर्लक्ष व अध्यक्षांची व्यस्तता यांमुळे महाज्योतीचा लाभ घेणाऱ्या गुणवंत ओबीसी विद्यार्थी व समाजाला सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या विकास योजनांना मुकावे लागले. हे ओबीसींचे दुर्दैव आहे. त्यामुळे महाज्योतीचा संपूर्ण कारभार स्वतंत्र्यरीत्या अध्यक्षांची नियुक्ती करून त्यांना देण्यात यावा.

- वंदना वनकर, अध्यक्ष, अखिल भारतीय सत्यशोधक महिला शिक्षक व शिक्षकेतर संघटना

- महाज्योतीच्या माध्यमातून व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आर्थिक विकास करायचा आहे; पण या संस्थेत व्हीजेएनटीला प्रतिनिधित्वच नाही. व्हीजेएनटीचे प्रश्न समजून घेणारा प्रतिनिधी नसल्याने महाज्योतीचा व्हीजेएनटीला लाभ होत नाही.

- दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी