शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

नागपुरात संपाचे सावट

By admin | Updated: September 2, 2016 02:52 IST

सरकारद्वारे कामगार कायद्यात सोयीनुसार करण्यात येत असलेल्या बदलांच्या विरोधात तसेच अन्य १२ प्रमुख

११ कर्मचारी संघटनांनी केले आवाहन : कामगार विरोधी धोरणाचा विरोधनागपूर : सरकारद्वारे कामगार कायद्यात सोयीनुसार करण्यात येत असलेल्या बदलांच्या विरोधात तसेच अन्य १२ प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. यात केंद्र बरोबरच राज्याचे कर्मचारीही सहभागी होणार आहे. नागपुरात जवळपास १५० केंद्रीय कार्यालय आहेत. त्याचबरोबर बँक, रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या देशव्यापी संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात नागपुरातही दिसणार आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण उद्योजकांच्या हिताचे असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. या संपात संघटित क्षेत्राबरोबरच असंघटित क्षेत्रातील कामगारांचाही समावेश आहे. कामगार कायद्यात होत असलेल्या बदलावर अंकुश लावण्याचा संपाचा उद्देश आहे. देशातील कामगार कायद्यामुळे विदेशी कंपन्या देशात गुंतवणूक करण्यास माघार घेत आहे. त्यामुळे सरकार कामगार कायद्यात बदल करण्यासंदर्भात विधेयक मांडणार आहे. यात औद्योगिक विवाद अधिनियम १९४७, ठेका मजूर कायदा १९७१, ट्रेड युनियन कायदा १९२६, औद्योगिक रोजगार कायदा १९४६, किमान वेतन कायदा, अप्रेंटिसशीप कायद्यासह ४४ कामगार कायद्यात संशोधनासह अन्य प्रस्ताव विधेयकात आहे. कर्मचारी संघटनांच्या मते या बदलानंतर कामगारांचे हक्क प्रभावित होणार आहेत. ३०० कर्मचारी संख्या असणारी कंपनी सहज कर्मचाऱ्यांना काढू शकणार आहे. त्यासाठी सरकारी परवानगीची गरज राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये किमान वेतनाची अट शिथिल झाल्यास कामगारांचे नुकसान होणार आहे. कामगार कायद्यातील नवीन बदल कामगार संघटनांचे अस्तित्व नाकारणारे आहेत. नवीन प्रस्तावित विधेयकात संघटन बनविण्यासाठी ७ ऐवजी १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहणार आहे. त्याचबरोबर कायद्यात बदल झाल्यानंतर बालकामगारांचे नियोजन, कामाचे तास, साप्ताहिक सुटी, ओव्हरटाईम, सामाजिक सुरक्षा यासह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधेपासूनही वंचित रहावे लागणार असल्याची चिंता संघटनांना भेडसावत आहे. त्यामुळे एक आक्रमक आंदोलन तयार करण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला आहे. संपात कास्ट्राईबचा सहभाग नाहीसरकारचे कामगारविरोधी धोरण व खासगीकरण धोरणाविरुद्ध काही ‘ट्रेड युनियन’ने संपाची घोषणा केली आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. परंतु या संपात कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना सहभागी होणार नाही, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे व सचिव नरेंद्र धनविजय यांनी दिली आहे. संघटनेच्या मते कामगार क्षेत्र व खासगीकरणाशी राज्य व जि.प. कर्मचारी संघटनांचा संबंध नाही, शिवाय संप पुकारताना सर्वांना विश्वासात घेण्यात आले नाही, मागासवर्गीयांच्या एकाही मागणीचा यात समावेश नाही. त्यामळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील ५ लाख, नागपूर जिल्ह्यातील १० हजार व जिल्हा परिषदेकडील ३५०० हजार कर्मचारी संपात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. परंतु संपकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा घोषित केला आहे. (प्रतिनिधी)