शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

समता प्रतिष्ठानला राज्य सरकारचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजप सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या समता प्रतिष्ठानचा कारभार पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाजप सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या समता प्रतिष्ठानचा कारभार पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार आहे. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला आहे. सरकारने प्रतिष्ठानसाठी एकूण १० नवीन पदांना नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे.

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या धर्तीवर राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. मागील भाजप सरकारच्या काळात या प्रतिष्ठानची स्थापना झाली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमावर झालेल्या खर्चात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. पुढेे चौकशी झाली. गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने समता प्रतिष्ठानमधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले होते. सामाजिक न्याय भवनातील समता प्रतिष्ठानचे कार्यालय मागील एप्रिल महिन्यापासून केवळ नावालाच सुरू होते. केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर कार्यालय चालविले जात होते. मुळात काम काहीच होत नव्हते. केवळ नावालाच कार्यालय सुरू होते.

सरकारने नुकतीच प्रतिष्ठानसाठी एकूण १० नवीन पदांना मंजुरी दिली आहे. यात चार नियमित, तर सहा बाह्यस्रोतांद्वारे भरावयाची आहेत. याची कार्यवाही अजून सुरू झाली नसली तरी प्रतिष्ठानचा कारभार पुन्हा एकदा जोमाने सुरू होईल, याची शक्यता बळावली आहे.

बार्टीबाबतही निर्णय घ्यावा

समता प्रतिष्ठानप्रमाणेच नागपुरातील बार्टीच्या विभागीय कार्यालयाचीही दूरवस्था आहे. हे कार्यालयसुद्धा केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर सुरू आहे. बार्टीच्या योजना खऱ्या अर्थाने विदर्भातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर नागपुरातील विभागीय कार्यालयालासुद्धा सरकारने बळ देण्याची गरज आहे.