शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांचा ‘स्ट्रॅटेजिक’ बंदोबस्त

By admin | Updated: July 31, 2015 02:50 IST

विविध समाजातील प्रतिष्ठित लोकांशी समन्वय साधून पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले.

नागपूर : विविध समाजातील प्रतिष्ठित लोकांशी समन्वय साधून पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले. तसेच समाजकंटकांना पद्धतशीरपणे संदेश पोहोचवण्यात आला. त्यामुळे संवेदनशील वस्त्यांमध्ये सुद्धा कोणताही गैरप्रकार झाला नाही. इतकेच नव्हे तर ज्या कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली त्या कारागृहाच्या परिसरातच ‘मॉर्निंग वॉक’ करणारे बिनधास्त फिरत होते. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जी ‘स्ट्रॅटेजी’ अवलंबिली होती, ती यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याकूब मेमन याच्या फाशीच्या प्रकरणाकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. यातच कायद्यातील तांत्रिक गुंतागुंत आणि क्षणाक्षणाला बदलत असलेला घटनाक्रम यामुळे हे प्रकरण आणखीनच ताणून धरले होते. तेव्हा याकूबला फाशी होते किंवा नाही अशा दोन्ही परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता होती.याकूबला नागपुरात फाशी दिली जाणार याची माहिती १५ दिवसांपूर्वीच बाहेर उघडकीस आली होती. त्यामुळे या प्रकरणावर चांगलीच चर्चा घडून येऊ लागली. फाशीचा विरोध करणारे आणि समर्थन करणारे असे दोन गट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच सुरुवातीला केवळ नागपूर शहरापूरता घोषित ‘रेड अलर्ट’ हा बदलत्या घटनाक्रमानंतर संपूर्ण देशभरासाठी लागू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जी व्यूहरचना आखली ती पूर्णत: यशस्वी ठरली.पोलिसांनी शहरातील जवळपास सर्वच संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काही रस्त्यांवर नाकेबंदीसुद्धा करण्यात आली होती. परंतु या नाकेबंदीदरम्यान सामान्य माणसाला कुठलाही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. (प्रतिनिधी)