शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

स्त्रीच्या जीवनाचे पैलू उलगडणारा कथात्म कोलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 03:00 IST

स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. तिचे प्रत्येकाशी बदलत जाणारे नाते आणि भावनांंचा पट तसा गुंतागुंतीचा आणि हळवा आहे.

अभिव्यक्ती संस्थेचे आयोजन : कथा लेखिकांचे दमदार सादरीकरण नागपूर : स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. तिचे प्रत्येकाशी बदलत जाणारे नाते आणि भावनांंचा पट तसा गुंतागुंतीचा आणि हळवा आहे. अभिव्यक्तीच्या सदस्यांनी हा स्त्रियांच्या जीवनाचा कोलाज कथांमधून सादर करीत एख अनोखा अनुभव श्रोत्यांना दिला. हा कार्यक्रम अभिव्यक्ती संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला. हा कार्यक्रम शंकरनगरच्या जिजामाता सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या आणि सेन्सॉर बोर्डाच्या नवनिर्वाचित सदस्य माधुरी आशिरगडे अध्यक्षस्थानी होत्या. मातेची ममता हा स्त्री लेखिकांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे त्याला प्राधान्य होते. एका उच्चपदविभूषित मुलाची अनास्था व व्यावहारिक दृष्टिकोन यामुळे व्यथित झालेली आई विजया मारोतकर यांनी साकारली. अल्पवयात आई झालेल्या जुलेखाची व्यथा अंजली पांडे यांच्या कथेतून दिसली. लेहसारख्या ठिकाणी काम करणाऱ्या वैमानिकांच्या बायकांना मायेचा ओलावा देणाऱ्या बॉसच्या पत्नीची ओळख गौरी अंधारे यांनी करून दिली. मोलकरीण हा सामान्य स्त्रियांच्या जीवनातला दुखरा कोपरा आहे. त्याबद्दलची काळजी मिटावी म्हणून शर्मिला महादेवकरांनी भेटीला आलेल्या देवालाच वेठीस कसे धरले हे आपल्या विनोदी शैलीत सांगितले. एका अनोख्या पैजेची पूर्ती करणारी मुलगी वीणा कुळकर्णी यांनी उभी केली. स्वाती देशपांडेला गावातल्या कामगाराचं मदत करणं भावलं. तर छाया कावळेनी गावाकडल्या इरसालपणाचा प्रत्यय आपल्या वऱ्हाडी कथेतून दिला. माधुरी आशिरगडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कथाकथन प्रभावी होण्यासाठी कथेचा आशय व सादरीकरण दोन्ही महत्त्वपूर्ण आहे, हे सांगितले. अभिव्यक्तीतर्फे यासाठी एखादे शिबिर घ्यावे असेही त्यांनी सुचविले. कथा कथनासाठी आत्मविश्वास महत्त्वपूर्ण असून सर्व सादरीकरणात तो होता, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माधुरीतार्इंचा सत्कार अभिव्यक्तीच्या अध्यक्ष सुप्रिया अय्यर यांनी केला. (प्रतिनिधी)