शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जातीय चष्म्यातून पाहणे बंद करा!

By admin | Updated: April 24, 2017 01:58 IST

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समस्त मागासवर्गीय आणि महिलांसाठी आयुष्यभर समर्पण भावनेने कार्य केले आहे.

वनभवनतर्फे संयुक्त जयंती कार्यक्रम : कृष्णा कांबळे यांचे आवाहन नागपूर : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समस्त मागासवर्गीय आणि महिलांसाठी आयुष्यभर समर्पण भावनेने कार्य केले आहे. त्यामुळेच महिलांना समान वेतन, मतदानाचा अधिकार व संपत्तीत समान वाटा मिळालेला आहे. एवढेच नव्हे तर आज सर्व भारतीयांची जी सर्वांगीण प्रगती झाली आहे त्याचे श्रेय बाबासाहेबांनी संविधानामध्ये केलेल्या सर्वसमावेशक तरतुदींना जाते. एवढ्यावरच ते थांबले नाही तर ज्यावेळी संसदेत हिंदू कोड बिल पारित झाले नाही त्यावेळेस त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भारतीय समाजाला समर्पण भावनेचा परिचय दिला. तरी समाजातील जातीयतेची कावीळ दूर सारून फुले-आंबेडकर यांच्या कार्याकडे जातीय चष्म्यातून न पाहता राष्ट्रपुरुष या दृष्टीने पाहण्याची मानसिकता तयार करावी, असे आवाहन प्रसिद्घ कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील वनभवन येथे संयुक्त समारोह समितीतर्फे आयोजित म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) के. एन. खवारे होते. अतिथी म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंग, डॉ. एस. एच. पाटील, डॉ. प्रवीण श्रीवास्तव, एन. एच. काकोडकर, टी. के. चौबे, एस. जी. टेंभूर्णीकर, मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एस. श्रीवास्तव, व्ही. व्ही. गुरमे, उपवनसंरक्षक मल्लिाकार्जुन व प्रशासकीय अधिकारी प्रकाश बमनोटे उपस्थित होते. यावेळी के. एन. खवारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांची जयंती ही आनंदासाठी साजरी केली जात नसून त्यांनी भारतीय समाजाला शिक्षण, अस्पृश्यता निवारण तसेच समता प्रस्थापित करण्यासाठी जे मोलाचे योगदान दिले, किंबहूना त्यांनी आपल्याला जो वारसा दिला त्याचे संचित म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करीत असतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)